gangajal blog

Gangajal Nature Foundation's Blog, http://www.gangajal.org.in



Archive for the ‘we love Mumbai’ Category

‘जन जोडो गंगा’ !

with one comment

 भारतीयांसाठी पवित्र असलेली आणि राष्ट्रीय नदी म्हणून जाहीर करण्यात आलेली आपली गंगा.. पण या नदीची आजची स्थिती काय आहे व तिला कोणकोणत्या समस्यांनी ग्रासले आहे, याविषयी जनजागृती करण्यासाठी मुंबईतील गंगाजल नेचर फाउंडेशनने आखलेल्या ‘जन जोडो गंगा’ अभियानास येत्या शुक्रवारपासून (५ मार्च) गंगेच्या उगमापासून सुरुवात होत आहे. त्यासाठी मुंबईतील सातजणांचे पथक उद्या (बुधवारी) गंगोत्रीकडे रवाना होत आहे.
गंगेच्या उगमापासून ते ती समुद्राला मिळते त्या मुखापर्यंत तब्बल २५२५ किलोमीटरचा प्रवास या अभियानांतर्गत केला जाणार आहे. या अभियानाच्या काळात अनेक तीर्थक्षेत्रे, शहरे व इतर महत्त्वाच्या ठिकाणी गंगेबाबत छायाचित्रांचे प्रदर्शन लावले जाणार आहे. फाउंडेशनचे अध्यक्ष विजय मुडशिंगीकर यांनी गेली काही वर्षे काढलेल्या छायाचित्रांचा उपयोग करून हे फिरते प्रदर्शन तयार करण्यात आले आहे. हे प्रदर्शन, तसेच विविध माहितीपट, सादरीकरण व तज्ज्ञांच्या व्याख्यानांद्वारेसुद्धा गंगेबाबत जनजागृती करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. याचबरोबर गंगेच्या किनाऱ्यावरील सर्वसामान्यांशी संवादही साधण्यात येणार आहे. आधीच्या नियोजनानुसार हे अभियान एक महिन्याचे होते, मात्र पुरेशा निधीअभावी ते पंधरा दिवसांत पूर्ण केले जाणार आहे.
मुडशिंगीकर यांच्याबरोबरच मुंबईतील सुरेंद्र मिश्रा, मच्छिंद्र पाटील, संतोष मरगज, माहितीपट निर्माते उन्मेश अमृते, मुंबई दूरदर्शनचे केवल नागवेकर हेही या अभियानात सहभागी होणार आहेत. याशिवाय पाणी व नद्यांच्या प्रश्नावर देशभर कार्यरत असलेले राजेंद्रसिंह राणा, तसेच गंगेच्या काठावरील शहरांमधील इतरही तज्ज्ञ व गंगेबाबत कार्यरत असलेल्या व्यक्तीसुद्धा या अभियानात सहभागी होणार आहेत. गंगोत्री, मुखवा, उत्तरकाशी, चंबा, जुनी टिहरी, ऋषिकेश, हरिद्वार, बिजनोर, रायबरेली, बिटूर, कानपूर, अलाहाबाद, मिर्जापूर, बनारस, बक्सर, पटना, कोलकाता, गंगासागर असा या अभियानाचा मार्ग असेल.

साभार लोकसत्ता.


http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=51568:2010-03-02-15-12-21&catid=41:2009-07-15-03-58-17&Itemid=81

पाणी जपून वापरणेच हिताचे !

without comments

पाणी टंचाई

पाणी टंचाई

तलावांमधील गढूळ पाणी शुद्धीकरण केंद्रांतून शुद्ध होऊन आपल्या घरी पोहोचल्यानंतर ते कसे वापरायचे हे ज्याचे त्याने ठरविले पाहिजे. सामाजिक भान राखून प्रत्येकाने काटकसरीने पाण्याचा अपव्यय टाळून पाण्याचा वापर करणे गरजेचे आहे.
यंदा पाऊस कमी पडल्यामुळे सध्या तीव्र पाणीटंचाई भेडसावत आहे. अशा परिस्थितीतही पाण्याचा जपून वापर करण्याकडे लोकांचा कल दिसून येत नाही. पाणी जपून वापरले नाही तर भविष्यात मुंबईकरांना पाण्यासाठी वणवण करावी लागणार आहे. अशा वेळी मुंबई

महानगरपालिकाही हतबल होईल. तलावांमध्येच पाणी नसेल तर पालिका मुंबईकरांना पाणीपुरवठा कुठून करेल. त्यामुळे नागरिकांनीच आता सजग होऊन ‘पाणी बचती’चा मूलमंत्र अवलंबायला हवा.
गेल्या काही वर्षांमध्ये मुंबई झपाटय़ाने विस्तारत गेली. दिवसागणिक मुंबईच्या लोकसंख्येने कोटय़वधीचा आकडा पार केला. त्याबरोबर पाण्याची गरजह वाढत गेली. मात्र उपलब्ध जलसाठय़ांचा विस्तार मात्र पाहिजे तेवढय़ा प्रमाणात झाला नाही. आजघडीला मुंबईकरांची पाण्याची तहान भागविण्यासाठी प्रतिदिनी ४३०० दशलक्ष लिटर पाण्याची आवश्यकता आहे. परंतु मुंबई महानगरपालिकेतर्फे प्रतिदिनी ३४०० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जातो. मात्र यंदा पाऊस कमी पडल्यामुळे मुंबईवर पाणीटंचाईचे संकट कोसळले आहे. महापालिकेतर्फे मुंबईला प्रतिदिनी २९०० दशलक्ष लिटर पाण्याचा पुरवठा करण्यात येत आहे. त्यातही पाणी चोरी आणि गळतीमुळे मुंबईकरांपर्यंत प्रतिदिनी २९०० दशलक्ष लिटर पाणी पोहोचतच नाही. त्यापैकी शेकडो दशलक्ष लिटर पाणी वाटेतच वाया जाते किंवा त्याची चोरी केली जाते.
महानगरपालिका मुंबईकरांना प्रतिदिनी प्रतिमाणशी १३५ लिटर पाणी उपलब्ध करते. मात्र सध्या पाणीटंचाई असल्यामुळे प्रतिदिनी प्रतिमाणशी ९० लिटर पाणी पुरविले जात आहे. तर यापुढे मुंबई शहरात उभ्या राहणाऱ्या नव्या इमारतींना प्रतिदिनी प्रतिमाणशी ४५ लिटर पाणी देण्याचा निर्णय महानगरपालिकेने घेतला आहे. तसेच नव्या इमारतींमध्ये बोअरवेल, तसेच रेनवॉटर हार्वेस्टसारख्या उपाययोजना करण्याच्या सूचनाही पालिकेतर्फे देण्यात आल्या आहेत. जेणेकरून नव्या इमारतींना पिण्याव्यतिरिक्त अन्य कामांसाठी लागणारे पाणी सहज उपलब्ध होऊ शकेल.

महानगरपालिकेतर्फे मुंबईतील जुन्या चाळींमध्ये राहणाऱ्या रहिवाशांना घरगुती वापरासाठी २ रुपये २५ पैसे प्रतिहजार लिटर दराने पाणी उपलब्ध करते.

पाणी वाचवा !

पाणी वाचवा !

तर मुंबापुरीतील सोसायटय़ांना ३ रुपये ५० पैसे प्रतिहजार लिटर दराने पाणी पुरवले जाते. तलावातील पाणी शुद्ध करून मुंबईकरांपर्यंत पोहोचविण्यासाठी पालिकेला प्रतिहजार लिटरसाठी  ७ रुपये ८० पैसे इतका खर्च येतो. मात्र खर्चाच्या तुलनेत पालिका मुंबईकरांना अतिशय कमी दरात पाणी उपलब्ध करते. साडेतीन रुपये प्रतिहजार लिटर दराने पालिका पाणी देते. म्हणजेत पालिकेकडून मिळणाऱ्या एक लिटर पाण्याचा दर

अतिशय नाममात्र होते. पण बाजारात ब्रॅण्डेड कंपन्यांची एक लिटर पाण्याची बाटली मुंबईकर १२ रुपये दराने खरेदी करतात. १२ रुपये प्रतिलिटर दराने खरेदी केलेले पाणी मुंबईकर प्रवासात जपून वापरत असले तरी नाममात्र दराने पालिकेकडून मिळणाऱ्या पाण्याची नासाडी करताना दिसतात. हे चित्र आता बदलायची वेळ आली आहे. सध्या पाणीटंचाई आहे म्हणून नव्हे, तर एकूणच पाण्याचे महत्त्व ओळखून ते जपून वापरणे गरजेचे आहे.
पाणीटंचाई असल्यामुळे सध्या महापालिका बोअरवेल खणण्यास परवानगी देत आहे. परंतु मोठय़ा प्रमाणावर बोअरवेल खोदले गेल्यास भूगर्भातील जलसाठय़ावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. भूगर्भातील गोडे पाणी बोअरवेलच्या माध्यमातून काढल्यास ती जागा समुद्राचे खारे पाणी घेईल. असे झाले तर मुंबईकरांना गोडय़ा पाण्यासाठी वणवण करावी लागेल. त्यामुळे आता महानगरपालिका रेनवॉटर हार्वेस्टचे महत्त्वही मुंबईकरांना पटवून देऊ लागली आहे. पावसाळ्यात रेनवॉटर हार्वेस्टद्वारे जमिनीत जास्तीत जास्त पाणी मुरविले, तर भूगर्भातील जलसाठय़ांचे जतन होण्यास मदत होईल.
दरम्यान, यंदा पाऊस कमी पडला म्हणून तो दरवर्षीच कमी पडेल असे नाही. पुढील वर्षी समाधानकारक पाऊस पडल्यावर तलाव भरभरून वाहतील आणि पाणीटंचाईचे संकट दूर होईल. मात्र पाणीटंचाईचे संकट दूर झाले तरी मुंबईकरांनी भविष्यात पाणी जपूनच वापरायला हवे.

प्रसाद रावकर

prasad.raokar@expressindia.com This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

साभार – लोकसत्ता.

This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

पाणी आणि वापर !

without comments

Untitled-1

साभार

अनंत देशपांडे

रूची, फेब्रुवारी २०१०

ग्रंथाली

‘गंगापुत्र’ ज्युलूभाई !

without comments

गंगाजल प्रदर्शनाचे अवलोकन करताना ज्युलियन हाँलिक.

Ganga2007coverएक दिवस सकाळी उल्हास लाटकर यांनी फोन करुन ज्युलियन हाँलिक यांच्या गंगा या इंग्रजी पुस्तकाचे मराठी अनुवादीत पुस्तक प्रकाशित करित असल्याचे कळविले. त्याचा मराठी अनुवाद महाराष्ट्र टाइम्सचे जेष्ट पत्रकार लेखक श्री. प्रकाश अकोलकर यांनी केल्याचे सांगितले. ‘गंगाजलच्या’ संकेतस्थळावरुन माझ्या विषयी कळल्याचे त्यांनी सांगितले. मनात उत्सुकता होती. पुस्तक वाचले.

ज्युलियन हाँलिक यांच गंगाप्रेम पुस्तक वाचताना पदोपदी जाणवत.

केवळ थेम्स नदीच्य काठी बालपण गेल या पार्श्वभूमीवर एक विदेशी त्यांना गंगानदीचे आकर्षण निर्माण होते. आणि ते आपल्य आयुष्यातील वीसवर्षे,  भारताची जीवनरेखा म्हणून ओळखली जाणारी महानदी गंगानदी हीच्यावर अभ्यासार्थ खर्ची घालतात. आपली निरीक्षणे,अंदाज, निष्कर्ष तसेच प्रदूषणावर काम करणा-या अनेक स्वंयसेवी संस्था तसेच व्यक्ती यांच्यासी संवाद साधतात. त्या सगळ्यांची मतं संकलीत करतात. शासकीय संस्था तसेच आधिकारी व मंत्री यांच्यासीही संवाद साधतात. त्या बरोबरच ते सर्वसामान्यंनाही विसरत नाहीत त्यांचा गंगानदी विषयीचा आदर हळूवार शब्दात मांडतात. गंगनदीचा पौराणिक संदर्भ तिचे धार्मिक महत्व याचे पदर उलघडण्या बरोबरच शेतीसाठी गंगानदीच्या पण्याचा होणार अतीवापर तसेच कारखानदारी व नागरी वस्त्याच्या सांडपाण्यामुळे होणा-या गंगाप्रदूषणावर ते टीकेची झोंड उठ्वतात. तितक्याच हळुवारपणे गंगाजलातील अगम्य गुढ, त्याला आपण अम्रुत का म्हणतो ते उलघवडण्याचा भावस्पर्षी प्रयत्न करतात. आणि तेवढ्याच कठोरपणे गंगेच देवत्वच कसं गंगानदीच्या मुळावर आलयं ते पटवूनही देतात.

DSCN9608

'जन जोडो गंगा यात्रा' जन जागरण अभियाना बाबत चर्चा करताना ज्युलियन हाँलिक.

कानपूर ते कोलकोता हा प्रवास बोटीतून करण्यासाठी लागणा-या अनुमतीसाठी केंद्रसरकारच्या प्रशासकिय अधीका-याच्या भेटी दरम्यान ‘फराक्का’ बाधांच्या संदर्भात काहिही न लिहीण्याची प्रशासकिय अधीका-याची सूचना फेटाळून केवळ सर्वसामांन्य भारतीयांना कळावे म्हणुन बिहार मधील आजच्या पूरस्थितीला जाबादार असलेल्या ‘फराक्का’ बांधावर आभ्यसपुर्ण असे एक प्रकरण लिहितात.

अशा या गंगावेड्या फिरंग्याची ओळ्ख करून द्यायची झालीतर, बी बी सी चा सजग पत्रकार आणि लेखक, रेडिओवरील अनेक कर्यक्रमाचे निर्माते, इस्लाम आणि साउथ एशिया याविषयावरील रेडिओसाठी बनविलेल्या मालिकानां विविध पुरस्कार मिळाले आहेत्.  मँसँच्युसेट येथे ना नफा या तत्वावर सुरू असलेल्या इंडपेन्डंट ब्राँडकास्टिंग असोसीअस या कंपणीचे संस्थापक,बी बी सी रेडिओ, बी बी सी वर्ल्ड सर्विस तसेच टोरोंटो येथील बी बी सी रेडिओसाठी अनेक कर्यक्रम स्वतंत्रपणे सादर. स्मिथ्सेनिअन मँगेझिन द न्यू रिपब्लिक या नियतकालिकामधे भारता विषयी विपूल लिखाण. द टाइम्स आँफ इंडिया आणि द हिन्दू या व्रुतपत्रांचे स्थंभ लेखक, अशी करून देता येईल.

आणखी उशिर होण्यापुर्वी या नदीला श्वास घ्यायची फुरसत द्यायला हवी. त्या साठी संघटित लोकश्क्तीचा दबाव आणून राजकिय इच्छाशक्ती या प्रश्र्नाकडे वळवणे, हाच गंगानदील वाचव्ण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे. गंगामाईला वाचवणे आता सर्वसामान्यांच्या हातात असल्याच ते प्रांजळपणे सांगतात. त्यांच पुस्तक वाचल्या पासून त्यांना भेटन्याची इच्छा मनात होती.

गंगामाईला वाचवणे आता सर्वसामान्यांच्या हातात असल्यान त्यांनाच जाग करण्याचा संकल्प सोडला तो जन ‘जोडो गंगा यात्रा’ या जनजागरण आभियानाच्या माद्यमाने. मार्च २०१० मध्ये गंगानदीच्या उगमा पासून ते गंगासागरा पर्यंत गंगाकाठावर ‘गंगाजल’ छायाचित्र प्रदर्शनाच्या माद्यमाने सर्वसामान्यांना गंगानदी सोबत जोडण्याचा प्रयत्न ‘गंगाजल नेचर फाऊंडेशन’ करणार आहे. या उपक्रमाची माहिती ज्युलियन हाँलिक यानां मेल द्वारे कळवले व या अभियानात सहभागी होण्याची विनंती केली असता त्यांनी अत्यंत सकारात्मक प्रतिसाद दिला. एवढेच नाही तर फेब्रुवारी-मार्च म्ध्ये भारतात असून कानपूर येथील कार्यक्रमात सहभागी होण्याच अश्वासनही दिले. काल झालेल्या त्यांच्या सोबतच्या बैठकीत त्यांनी ‘गंगाजल’ या छायाचित्र प्रदर्शना विषयी  समाधान व्यक्त केले. या गंगापुत्रा सोबत चर्चा करताना भाषेची अडचण होती. ती, माझे मित्र गंगाजल चे सभासद श्री. नरेंद्र प्रभू यांच्यामुळे दूर झाली.

3rd National Documentary and Photography Competition 2009 ! Organised By Gangajal Nature Foundation.

without comments

123