ती दयेची माता होती, ती कारुण्यसिंधू होती, ती भवदु:खहारी होती, ती गोरगरिबांची, भुकेलेल्यांची माता होती. जशी असायला हवी तशीच तीही एक आई होती. शंभर वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी जन्मलेल्या आणि नंतर दिगंत कीर्ती झालेल्या या महिलेने हजारो-लाखो जिवांना धीर दिला, जगण्याचे बळ दिले. ही आई म्हणजे अर्थातच मदर तेरेसा! २६ ऑगस्ट १९१० रोजी अल्बानियात जन्मलेल्या मुलीचा [...]
महाराष्ट्रात पाण्याची टंचाई पूर्वीच्या काळात अधुनमधून सांगितली जायची. अण्णा हजारे म्हणतात, की हजारो कोटी रुपये दरवर्षी पाण्यापायी पाण्यात जातात! टंचाईग्रस्त गावांची संख्या १९७२च्या दुष्काळापासून दिवसेंदिवस वाढतच आहे. बाहत्तरचा दुष्काळ फार भीषण होता, परंतु पाणी नसलेली किंवा पाण्याची टंचाई असलेली गावं फार कमी होती, काहीशे फक्त हाताने सोंगट्या हलवत्याप्रमाणे धरणावर नियंत्रण – चित्र गिरीश कुलकर्णी दिवसेंदिवस [...]
Recent Comments