gangajal blog

Gangajal Nature Foundation's Blog, http://www.gangajal.org.in



Archive for the ‘River’ Category

‘जन जोडो गंगा’ !

with one comment

 भारतीयांसाठी पवित्र असलेली आणि राष्ट्रीय नदी म्हणून जाहीर करण्यात आलेली आपली गंगा.. पण या नदीची आजची स्थिती काय आहे व तिला कोणकोणत्या समस्यांनी ग्रासले आहे, याविषयी जनजागृती करण्यासाठी मुंबईतील गंगाजल नेचर फाउंडेशनने आखलेल्या ‘जन जोडो गंगा’ अभियानास येत्या शुक्रवारपासून (५ मार्च) गंगेच्या उगमापासून सुरुवात होत आहे. त्यासाठी मुंबईतील सातजणांचे पथक उद्या (बुधवारी) गंगोत्रीकडे रवाना होत आहे.
गंगेच्या उगमापासून ते ती समुद्राला मिळते त्या मुखापर्यंत तब्बल २५२५ किलोमीटरचा प्रवास या अभियानांतर्गत केला जाणार आहे. या अभियानाच्या काळात अनेक तीर्थक्षेत्रे, शहरे व इतर महत्त्वाच्या ठिकाणी गंगेबाबत छायाचित्रांचे प्रदर्शन लावले जाणार आहे. फाउंडेशनचे अध्यक्ष विजय मुडशिंगीकर यांनी गेली काही वर्षे काढलेल्या छायाचित्रांचा उपयोग करून हे फिरते प्रदर्शन तयार करण्यात आले आहे. हे प्रदर्शन, तसेच विविध माहितीपट, सादरीकरण व तज्ज्ञांच्या व्याख्यानांद्वारेसुद्धा गंगेबाबत जनजागृती करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. याचबरोबर गंगेच्या किनाऱ्यावरील सर्वसामान्यांशी संवादही साधण्यात येणार आहे. आधीच्या नियोजनानुसार हे अभियान एक महिन्याचे होते, मात्र पुरेशा निधीअभावी ते पंधरा दिवसांत पूर्ण केले जाणार आहे.
मुडशिंगीकर यांच्याबरोबरच मुंबईतील सुरेंद्र मिश्रा, मच्छिंद्र पाटील, संतोष मरगज, माहितीपट निर्माते उन्मेश अमृते, मुंबई दूरदर्शनचे केवल नागवेकर हेही या अभियानात सहभागी होणार आहेत. याशिवाय पाणी व नद्यांच्या प्रश्नावर देशभर कार्यरत असलेले राजेंद्रसिंह राणा, तसेच गंगेच्या काठावरील शहरांमधील इतरही तज्ज्ञ व गंगेबाबत कार्यरत असलेल्या व्यक्तीसुद्धा या अभियानात सहभागी होणार आहेत. गंगोत्री, मुखवा, उत्तरकाशी, चंबा, जुनी टिहरी, ऋषिकेश, हरिद्वार, बिजनोर, रायबरेली, बिटूर, कानपूर, अलाहाबाद, मिर्जापूर, बनारस, बक्सर, पटना, कोलकाता, गंगासागर असा या अभियानाचा मार्ग असेल.

साभार लोकसत्ता.


http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=51568:2010-03-02-15-12-21&catid=41:2009-07-15-03-58-17&Itemid=81

‘Gangajal’ Photo Exhibition, Photography By Vijay Mudshingikar.

without comments

The most serious problem today is the destruction of our environment. General population is ignorant about it. Pollution, draught, flood, soil and water problems are not natural but they are consequences of uncaring and selfish attitude of mankind. Not only present but future generations too will suffer due to the ill-effects of this. Gangajal Nature Foundation is making an effort to awaken people from their deep slumber.

We appreciated the work done by Hon. Shri Rajiv Ji Gandhi on the Dying Ganga. River Ganga is declared as a National River of India by Prime Minister Mr. Manmohan Singh in 2008 which was ‘International Year of Rivers’

Gangajal Nature Foundation is working hard for last four years towards awakening and educating people about upkeep of rivers and lakes by organizing photo exhibitions, screening of the documentary, by holding national level competitions in essay-writing, photography and documentaries. So far around seventy thousand sensible citizens have visited the eleven exhibitions.

We are trying to spread awareness about water pollution, through the medium of ‘Gangajal photo exhibition’  since last four years. We are exhibiting Photographs of  India’s National River The Ganga clicked by our Founder President Mr. Vijay Mudshingikar from the year 2001 to 2006. Our  ‘Gangajal’  documentary film based on these photographs  as tools to spread awareness.

Gangajal Photo Echibition
Gangajal Photo Exhibition
“Jan Jodo Ganga Yatra” (Connecting people to Ganga)
“Jan Jodo Ganga Yatra” (Connecting people to Ganga)
My few Worlds - Vijay Mudshingikar
My few Worlds – Vijay Mudshingikar
Gomukha (Cow’s Mouth),elevation 12,700 feet, where the Bhagirathi Ganga emerges from the Gangotri Glacier. Uttarakhand.
Gomukha (Cow’s Mouth),elevation 12,700 feet, where the Bhagirathi Ganga emerges from the Gangotri Glacier. Uttarakhand.
 Gomukha, Pilgrims in late winter at Gomukha, Gangotri, Uttarakhand.
Gomukha, Pilgrims in late winter at Gomukha, Gangotri, Uttarakhand.
Bhojvasa, Bhagitrathi peaks (21,364 feet, 21,176 feet and 22,496 feet), Shivaling peak (21,466feet), Uttarakhand.
Bhojvasa, Bhagitrathi peaks (21,364 feet, 21,176 feet and 22,496 feet), Shivaling peak (21,466feet), Uttarakhand.
Chirbasa, Hard root to Gomukha and pilgrims, Gangotri, Uttarakhand.
Chirbasa, Hard root to Gomukha and pilgrims, Gangotri, Uttarakhand.
Uttarakhand govt sounds red alert on the Gomukha, Gangotri, Uttarakhand.
Uttarakhand govt sounds red alert on the Gomukha, Gangotri, Uttarakhand.
Gangotri temple in mid winter, elevation 10,000 feet, Gangotri, Uttarakhand.
Gangotri temple in mid winter on 2nd Feb 2006, elevation 10,000 feet, Gangotri, Uttarakhand.
  Doli Yatra, Festival of Door opening on Akshay Tritiya in the month of April-May, Gangotri, Uttarakhand.
Doli Yatra, Festival of Door opening on Akshay Tritiya, Gangotri, Uttarakhand.
 Suryakund, water fall of the River Ganga, Gangotri, Uttarakhnd.
Suryakund, water fall of the River Ganga, Gangotri, Uttarakhnd.
Bhairavghati, Gangotri, Uttarakhand.
Bhairavghati, Gangotri, Uttarakhand.
 River Alaknanda, Badrinath, Valley of Flowers, Himkund, Uttarakhand.
River Alaknanda, Badrinath, Valley of Flowers, Himkund, Uttarakhand.
Devprayag, sacred confluence of the Bhagirath Ganga, left, and the Alaknanda, right, Devprayag, Uttarakhand.
Devprayag, sacred confluence of the Bhagirath Ganga, left, and the Alaknanda, right, Devprayag, Uttarakhand.
13) Doli Yatra festival, Mukhava, Uttarakhand.
Doli Yatra festival, Mukhava, Uttarakhand.
 Uttarkashi, Uttarakhand.
Uttarkashi, Uttarakhand.
Dharasu Bend, Uttarakhand,
Dharasu Bend, Uttarakhand,
 Laxman Zula, Hrishikesh, Uttarakhand.
Laxman Zula, Hrishikesh, Uttarakhand.
Haridwar, View from Mansadevi Temple, Haridwar, Uttarakhand.
Haridwar, View from Mansadevi Temple, Haridwar, Uttarakhand.
 Kawar Yatra, Hari Ki Pouri, Haridwar, Uttarakhand.
Kawar Yatra, Hari Ki Pouri, Haridwar, Uttarakhand.
Save Ganga Movement, Jagjeetpur water treatment plant, Haridwar, Uttarakhand.
Save Ganga Movement, Jagjeetpur water treatment plant, Haridwar, Uttarakhand.
Brajghat, Gadhmukteswar, Uttar Pradesh.
Brajghat, Gadhmukteswar, Uttar Pradesh.
Brhmavartghat, Bitur, Kanpur, Uttar Pradesh.
Brhmavartghat, Bitur, Kanpur, Uttar Pradesh.
Crores liters of Sewage water and tannery’s waste chemical in the Ganga, Jajmaou, Kanpur, Uttar Pradesh.
Crores liters of Sewage water and tannery’s waste chemical in the Ganga, Jajmaou, Kanpur, Uttar Pradesh.
 Maghmela, Triveni Sangam, Prayag, Allahabad, Uttar Pradesh.
Maghmela, Triveni Sangam, Prayag, Allahabad, Uttar Pradesh.
Bone ash Abandonment, Teiveni Sangam, prayag, Allahabad, Uttar Pradesh.
Bone ash Abandonment, Teiveni Sangam, prayag, Allahabad, Uttar Pradesh.
 Sacred Confluence of the River Ganga, Yamuna and Sarswati, Maghmela, Prayag, Allahabad, Uttar Pradesh.
Sacred Confluence of the River Ganga, Yamuna and Sarswati, Maghmela, Prayag, Allahabad, Uttar Pradesh.
Seagulls, Sacred Confluence of the River Ganga, Yamuna and Sarswati, Maghmela, Prayag, Allahabad, Uttar Pradesh.
Seagulls, Sacred Confluence of the River Ganga, Yamuna and Sarswati, Maghmela, Prayag, Allahabad, Uttar Pradesh.
Biggest Solar eclipse of the 21st century at Banaras. Prayag ghat, Banaras, Uttar Pradesh.
Biggest Solar eclipse of the 21st century at Banaras. Prayag ghat, Banaras, Uttar Pradesh.
Ganga Arti, Prayag Ghat, Banaras, Uttar Pradesh.
Ganga Arti, Prayag Ghat, Banaras, Uttar Pradesh.
Secular Ganga, Prayag Ghat, Banaras, Uttar Pradesh.
Secular Ganga, Prayag Ghat, Banaras, Uttar Pradesh.
Durga Festival, Prayag Ghat, Banaras, Uttar Pradesh.
Durga Festival, Prayag Ghat, Banaras, Uttar Pradesh.
Kartik Ganga Bath, Light Festival, Banaras, Uttar Pradesh.
Kartik Ganga Bath, Light Festival, Banaras, Uttar Pradesh.
Light festival, Prayag Ghat, Banaras, Uttar Pradesh.
Light festival, Prayag Ghat, Banaras, Uttar Pradesh.
 Gangajal, Crores liters of Sewage water and chemical waste in the Ganga Dally, Banaras, Uttar Pradesh.
Gangajal, Crores liters of Sewage water and chemical waste in the Ganga Dally, Banaras, Uttar Pradesh.
  Manikarnika Ghat, Banaras, Uttar Pradesh.
Manikarnika Ghat, Banaras, Uttar Pradesh.
Harishchandra Ghat, Banaras, Uttar Pradesh.
Harishchandra Ghat, Banaras, Uttar Pradesh.
Sunrise, Narad Ghat, Banaras, Uttar Pradesh.
Sunrise, Narad Ghat, Banaras, Uttar Pradesh.
Chat Festival, Golghar, Patna, Bihar.
Chat Festival, Golghar, Patna, Bihar.
Chat Festival, Bass Ghat, Patna, Bihar.
Chat Festival, Bass Ghat, Patna, Bihar.

Chat Festival, Collectori Ghat, Patna, Bihar.
Chat Festival, Collectori Ghat, Patna, Bihar.
Drainage in the Ganga at Bass Ghat, Patna, Bihar.
Drainage in the Ganga at Bass Ghat, Patna, Bihar.
Howrah Bridge, Kolkata, West Bengal.
Howrah Bridge, Kolkata, West Bengal.
Kali Mata Temple, Kalighat, Kolkata, West Bengal.
Kali Mata Temple, Kalighat, Kolkata, West Bengal.
Durga Festival, Kolkata, West Bengal.
Durga Festival, Kolkata, West Bengal.
Durga Visrjan, Babu Ghat, Kolkata, West Bengal.
Durga Visrjan, Babu Ghat, Kolkata, West Bengal.

Dakshineswari Temple, Bellur Math, Kolkata, West Bengal.
Dakshineswari Temple, Bellur Math, Kolkata, West Bengal.
Gangajal, Backyard of Bellur Math, Kolkata, West Bengal.
Drainage in the Ganga (Hugely River), Backyard of Bellur Math, Kolkata, West Bengal.
Industrial waste chemical in the Ganga (Hugely River), Titagadh, West Bengal.
Industrial waste chemical in the Ganga (Hugely River), Titagadh, West Bengal.
Journey To Gangasagar,  24 Paragana, West Bengal.
Journey To Gangasagar, 24 Paragana, West Bengal.

Kapilmuni Ashram, Gangasar Mela,  West Bengal.
Kapilmuni Ashram, Gangasar Mela, West Bengal.
Naga Sadhus, Gangasagar Mela, West Bengal.
Naga Sadhus, Gangasagar Mela, West Bengal.
 Son of Ganga Maiyya, Gangasagar Mela, West Bengal.
Son of Ganga Maiyya, Gangasagar Mela, West Bengal.
 Sacred confluence of the River Ganga and Sagar (Bay of Bengal), Gangasagar, West Bengal.
Sacred confluence of the River Ganga and Sagar (Bay of Bengal), Gangasagar, West Bengal.
Together we can make Difference.....Let's do it ! Save Water Save Nature !
Together we can make Difference…..Let’s do it ! Save Water Save Nature !

  Save River Ganga movemunt by ‘Gangajal Nature Foundation, Mumbai’. We need your Co-Operation.
Save River Ganga movement by ‘Gangajal Nature Foundation, Mumbai’. We need your Co-Operation.

Save Ganga ! Save India !

जन जोडो गंगा अभियान !

without comments

Pudhari

‘गंगापुत्र’ ज्युलूभाई !

without comments

गंगाजल प्रदर्शनाचे अवलोकन करताना ज्युलियन हाँलिक.

Ganga2007coverएक दिवस सकाळी उल्हास लाटकर यांनी फोन करुन ज्युलियन हाँलिक यांच्या गंगा या इंग्रजी पुस्तकाचे मराठी अनुवादीत पुस्तक प्रकाशित करित असल्याचे कळविले. त्याचा मराठी अनुवाद महाराष्ट्र टाइम्सचे जेष्ट पत्रकार लेखक श्री. प्रकाश अकोलकर यांनी केल्याचे सांगितले. ‘गंगाजलच्या’ संकेतस्थळावरुन माझ्या विषयी कळल्याचे त्यांनी सांगितले. मनात उत्सुकता होती. पुस्तक वाचले.

ज्युलियन हाँलिक यांच गंगाप्रेम पुस्तक वाचताना पदोपदी जाणवत.

केवळ थेम्स नदीच्य काठी बालपण गेल या पार्श्वभूमीवर एक विदेशी त्यांना गंगानदीचे आकर्षण निर्माण होते. आणि ते आपल्य आयुष्यातील वीसवर्षे,  भारताची जीवनरेखा म्हणून ओळखली जाणारी महानदी गंगानदी हीच्यावर अभ्यासार्थ खर्ची घालतात. आपली निरीक्षणे,अंदाज, निष्कर्ष तसेच प्रदूषणावर काम करणा-या अनेक स्वंयसेवी संस्था तसेच व्यक्ती यांच्यासी संवाद साधतात. त्या सगळ्यांची मतं संकलीत करतात. शासकीय संस्था तसेच आधिकारी व मंत्री यांच्यासीही संवाद साधतात. त्या बरोबरच ते सर्वसामान्यंनाही विसरत नाहीत त्यांचा गंगानदी विषयीचा आदर हळूवार शब्दात मांडतात. गंगनदीचा पौराणिक संदर्भ तिचे धार्मिक महत्व याचे पदर उलघडण्या बरोबरच शेतीसाठी गंगानदीच्या पण्याचा होणार अतीवापर तसेच कारखानदारी व नागरी वस्त्याच्या सांडपाण्यामुळे होणा-या गंगाप्रदूषणावर ते टीकेची झोंड उठ्वतात. तितक्याच हळुवारपणे गंगाजलातील अगम्य गुढ, त्याला आपण अम्रुत का म्हणतो ते उलघवडण्याचा भावस्पर्षी प्रयत्न करतात. आणि तेवढ्याच कठोरपणे गंगेच देवत्वच कसं गंगानदीच्या मुळावर आलयं ते पटवूनही देतात.

DSCN9608

'जन जोडो गंगा यात्रा' जन जागरण अभियाना बाबत चर्चा करताना ज्युलियन हाँलिक.

कानपूर ते कोलकोता हा प्रवास बोटीतून करण्यासाठी लागणा-या अनुमतीसाठी केंद्रसरकारच्या प्रशासकिय अधीका-याच्या भेटी दरम्यान ‘फराक्का’ बाधांच्या संदर्भात काहिही न लिहीण्याची प्रशासकिय अधीका-याची सूचना फेटाळून केवळ सर्वसामांन्य भारतीयांना कळावे म्हणुन बिहार मधील आजच्या पूरस्थितीला जाबादार असलेल्या ‘फराक्का’ बांधावर आभ्यसपुर्ण असे एक प्रकरण लिहितात.

अशा या गंगावेड्या फिरंग्याची ओळ्ख करून द्यायची झालीतर, बी बी सी चा सजग पत्रकार आणि लेखक, रेडिओवरील अनेक कर्यक्रमाचे निर्माते, इस्लाम आणि साउथ एशिया याविषयावरील रेडिओसाठी बनविलेल्या मालिकानां विविध पुरस्कार मिळाले आहेत्.  मँसँच्युसेट येथे ना नफा या तत्वावर सुरू असलेल्या इंडपेन्डंट ब्राँडकास्टिंग असोसीअस या कंपणीचे संस्थापक,बी बी सी रेडिओ, बी बी सी वर्ल्ड सर्विस तसेच टोरोंटो येथील बी बी सी रेडिओसाठी अनेक कर्यक्रम स्वतंत्रपणे सादर. स्मिथ्सेनिअन मँगेझिन द न्यू रिपब्लिक या नियतकालिकामधे भारता विषयी विपूल लिखाण. द टाइम्स आँफ इंडिया आणि द हिन्दू या व्रुतपत्रांचे स्थंभ लेखक, अशी करून देता येईल.

आणखी उशिर होण्यापुर्वी या नदीला श्वास घ्यायची फुरसत द्यायला हवी. त्या साठी संघटित लोकश्क्तीचा दबाव आणून राजकिय इच्छाशक्ती या प्रश्र्नाकडे वळवणे, हाच गंगानदील वाचव्ण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे. गंगामाईला वाचवणे आता सर्वसामान्यांच्या हातात असल्याच ते प्रांजळपणे सांगतात. त्यांच पुस्तक वाचल्या पासून त्यांना भेटन्याची इच्छा मनात होती.

गंगामाईला वाचवणे आता सर्वसामान्यांच्या हातात असल्यान त्यांनाच जाग करण्याचा संकल्प सोडला तो जन ‘जोडो गंगा यात्रा’ या जनजागरण आभियानाच्या माद्यमाने. मार्च २०१० मध्ये गंगानदीच्या उगमा पासून ते गंगासागरा पर्यंत गंगाकाठावर ‘गंगाजल’ छायाचित्र प्रदर्शनाच्या माद्यमाने सर्वसामान्यांना गंगानदी सोबत जोडण्याचा प्रयत्न ‘गंगाजल नेचर फाऊंडेशन’ करणार आहे. या उपक्रमाची माहिती ज्युलियन हाँलिक यानां मेल द्वारे कळवले व या अभियानात सहभागी होण्याची विनंती केली असता त्यांनी अत्यंत सकारात्मक प्रतिसाद दिला. एवढेच नाही तर फेब्रुवारी-मार्च म्ध्ये भारतात असून कानपूर येथील कार्यक्रमात सहभागी होण्याच अश्वासनही दिले. काल झालेल्या त्यांच्या सोबतच्या बैठकीत त्यांनी ‘गंगाजल’ या छायाचित्र प्रदर्शना विषयी  समाधान व्यक्त केले. या गंगापुत्रा सोबत चर्चा करताना भाषेची अडचण होती. ती, माझे मित्र गंगाजल चे सभासद श्री. नरेंद्र प्रभू यांच्यामुळे दूर झाली.

नदीभोवती तलावांची साखळी !

without comments

नदीभोवती तलावांची साखळी
धरणे हा पाण्याचा स्रोत बनू शकत नाही. नदीच्या उगमापासून शेवटपर्यंत ठराविक अंतरावर तिला समांतर असे पाच-दहा एकराचे तलाव निर्माण करून पुराचे पाणी सोडणे ही योजना उपयुक्त ठरू शकते. त्यामुळे उगमापासून शेवटपर्यंत पिण्यासाठी व शेतीसाठी मुबलक पाणी मिळेल. धरणाची दारे उघडल्याने शेतीची व गावांची होणारी हानी टळेल. नद्या बारमाही राहतील. सध्या लहान-मोठय़ा शहरांचे थेट नदीत सोडले जाणारे सांडपाणी तलावात सोडले तर त्यावर प्रक्रिया करणे व ते शेतीसाठी-वीजनिर्मितीसाठी वापरणे शक्य बनेल. प्रत्येक गावात तलाव, नाला असतोच. ही योजना गावोगावी राबवली तर पाण्याचा प्रश्न संपुष्टात येईल. नदीपात्रात केल्या जाणाऱ्या धार्मिक विधीमुळे प्रदूषणही या योजनेमुळे १०० टक्के टाळता येईल.
- पुरुषोत्तम कुबडे, अंधेरी, मुंबई
प्राथमिक पातळीवर जलसंधारण
इस्रायलसारख्या देशात भूजलाची ठराविक पातळी कायम ठेवूनच पाणीसाठा उपसला जातो. आपल्याकडे याबाबत कायदा नाही. राष्ट्रीय नद्याजोड प्रकल्प या प्रकल्पाचा उद्देश तर सर्वज्ञात आहे. भारताला पर्जन्य मिळवून देणारा मान्सून अनिश्चित असला तरी प्रत्येक वर्षी पाऊस पडतोच. मग या पाण्याचा भविष्यात योग्य विनियोग का होत नाही? राष्ट्रीय नद्याजोड प्रकल्पात काही विचार केला गेला. परंतु भीती आहे ती नद्यांची नैसर्गिक प्रणाली नष्ट होण्याची, जलचरांच्या अस्तित्वाची व मानवी विस्थापनाची. म्हणूनच नद्याजोड प्रकल्पापेक्षा प्राथमिक पातळीवर पावसाच्या पाण्याचे संधारण करून या कार्यात पंचायत राजमधील घटकांचा सहभाग वाढवण्याला महत्त्व द्यावे.
- शीतल गारुडकर, कृषी महाविद्यालय, पुणे
पाणीबचतीसाठी सरकारी योजना
पाऊस कमी पडतो तेव्हा त्याचा शंभर टक्के साठा करता यावा. १९७२ च्या दुष्काळात महाराष्ट्रातील खेडय़ात सामुदायिक विहिरी खोदण्याचे काम घेण्यात आले होते. त्यासाठी एक गुंठा जमीन सरकारने शेतकऱ्यांकडून दान घेतली होती. ज्या विहिरीत पाणी लागले नाही त्यात पावसाचे पाणी साठविण्याचा प्रयत्न करावा. पावसाचे पाणी अचानक धनलाभाप्रमाणे थेंब न थेंब बचत करण्यासाठी सरकारी योजना ग्रामीण भागात जिल्हा परिषद, ग्रामपंचायतीने व शहरी भागात नगरपलिका, महानगरपालिकेने हाती घ्याव्या. नागरिकांना घराच्या चारही बाजूस किंवा किमान एक बाजूस तरी हौद बांधून त्यात पावसाचे पाणी जमा करावे.
- का. मा. देशपांडे, नांदेड
मोठे प्रकल्प हाच उपाय
जगातील सर्वच मोठे प्रकल्प व आपल्याकडील कोकण रेल्वेच्या प्रस्तावाकडे पाहून भली भली मंडळी तोंड वेडावत होती. प्रत्यक्षात हे प्रकल्प साकारले. त्याचप्रमाणे नदीजोड अर्थात गंगा-कावेरी योजना देशाचे भले करेल. त्याबाबत साधकबाधक चर्चा व्हावी. त्यामुळे रोजगारनिर्मिती होईल, लाखो हेक्टर जमीन भिजेल. कित्येक खेडय़ांमधील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटेल. कोटय़वधी पूरग्रस्तांना दिलासा मिळेल. राज्याराज्यांचे पाणीतंटे थांबतील. आतापर्यंतचे नियोजन मंडळाचे पाण्यासंबंधीचे नियोजन फारसे सफल झाले नाही. जलासंधारणाने पाण्याचे प्रश्न न सुटल्याने गंगा-कावेरी योजनेकडे वळावे लागले. या योजनेचा महाराष्ट्राला प्रत्यक्ष नसला, तरी अप्रत्यक्षपणे मोठा फायदा होणार आहे.
- भास्करराव म्हस्के (स्थापत्य अभियंता)
पश्चिम भारताला पाणी पुरवा
नदीजोड प्रकल्प ही योजना विविध कारणांसाठी अव्यवहार्य आणि टाकाऊ ठरते. पाण्याची गरज मुख्यत: पश्चिम भारताला आहे. त्यासाठी हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमधून कालवा करून तेथील पाणी (भाकडानांगलप्रमाणे हरियाणामार्गे) नैसर्गिक उताराने राजस्थान-गुजरातेत आणता येते. कालवा नर्मदा-तापी ओलांडून वर चढविल्यास गोदावरीच्या मुखात सोडल्यास ते दुष्काळी मराठवाडय़ाला पुरवता येईल. अभियंता दस्तूर यांच्या ‘पुष्पहार’ प्रकल्पात पश्चिमेकडील दुष्काळी भागाला पाणी देण्याचीच कल्पना होती. ती शक्यता पडताळून पाहावी; अन्यथा नदीजोड प्रकल्प (नसलेल्या) पाण्यात बुडवावा!
- सुधाकर डोईफोडे, नांदेड
अंमलबजावणीची सक्ती हवी
गुजरात, राजस्थानात कमी पाऊस असूनही तिथे पाण्याची टंचाई का भासत नाही? तिथे पाण्याचे व्यवस्थित नियोजन कसे होते? लोकांवर छतावरील पाणी मुरविणे, बांध घालणे, तलाव खणणे, पावसाचे पाणी जमिनीत मुरविणे असे बंधन असायला हवे. या गोष्टींची वैयक्तिक, गाव पातळीवर अंमलबजावणीची सक्ती हवी. त्यासाठीचे नियम मोडले तर जबर शिक्षासुद्धा हवी. लोकांना या गोष्टींचे महत्त्व पटवून दिले तर ते पटून लोक पुढाकार घेतील. मध्य प्रदेशात १९९९ साली डॉ. राव यांनी भूजलसंवर्धनाचे अभियान चालविल्याने देवासला वाळवंट होण्यापासून वाचवता आले. पाण्याचा प्रश्न सरकारवर सोपवून भागणार नाही. किंबहुना, सरकारला जाब विचारणे किंवा दोषी ठरविणे सोडून देऊन सामान्य नागरिकाला रुचेल अशी योग्य पावले एकत्रितपणे उचलावीत.
- रश्मी रविशेखर बदनोरे, यवतमाळ
कमतरता नव्हे, नियोजनाचा अभाव
देशात पाण्याची कमतरता नाही, नियोजनाअभावी सर्वाना पाणी मिळू शकत नाही. नदीजोड प्रकल्पामुळे मोठे क्षेत्र ओलिताखाली येईल व शेतीला चालना मिळेल. सर्व भागात नव्या इमारतींसाठी ‘रेनवॉटर हार्वेस्टिंग’ राबवावे. पथनाटय़े, लोकनाटय़ांद्वारे लोकांना पाण्याचे महत्त्व पटवून द्यावे. देशभर एक दिवसाआड पाणी पुरवठा करावा म्हणजे पाण्याचा अपव्यय टळेल. झाडे लावावीत व उतारावर चर खणून जास्तीत जास्त पाणी मुरविण्याचा प्रयत्न करावा.
- धीरज निंबाळकर, जळगाव
प्रत्येक थेंब जिरवा
देशात चार कोटी क्षेत्राला पुराचा धोका आहे, तर देशाचा ६८ टक्के भाग दुष्काळप्रवण आहे. अशा परिस्थितीत राजकारण्यांनी नदीजोड प्रकल्प रद्द करून देशाला दारिद्रयाच्या खायीत टाकले. ते करायचे नसेल तर गावात पडणारे पाणी गावातच जिरविण्याची व्यवस्था हवी. लहान नद्या रुंद करून प्रत्येक टप्प्यात लहान बंधारे बांधून पाणी अडवावे. शेतीची बांधबंदिस्ती व सपाटीकरण करावे. रासायनिक खतांऐवजी जैविक खते वापरावीत. शिरपूर तालुक्यासारखा प्रकल्प राज्यातील प्रत्येक तालुक्यात राबवून पाणी जिरवावे.
- श्रीराम चोथे-पिंपळगावकर, नांदेड
शेतीवर विपरीत परिणाम
देशात एकीकडे महापूर तर दुसरीकडे दुष्काळ असे विदारक चित्र दिसते. त्याचा शेतीवर विपरीत परिणाम झाला आहे. येत्या काळात कोणते प्रकल्प प्राधान्याने राबवावे याबाबत तज्ज्ञांचा सल्ला, त्याचप्रमाणे शेतकरी व स्थानिक लोकांचा सल्ला घेणेही आवश्यक आहे. सांगली जिल्ह्य़ात वारणा नदीच्या दोन्ही बाजूने कालवे काढून केलेला खर्च वाया गेला आहे, कारण त्यामुळे शेतीचे नुकसानच झाले आहे. नद्याजोड प्रकल्प शास्त्रीयदृष्टय़ा राबविला जावा, म्हणजे बारमाही नद्यांचे पाणी दुष्काळी भागाकडे वळवता येईल.
- गणेश पाटील, कापरी, सांगली
भूजल पुनर्भरण हाच उपाय
जलव्यवस्थापनासाठी भूजल पुनर्भरण महत्त्वाचे आहे. पण सर्वसामान्य कूपनलिकांनी ते होणार नाही, कारण पोकळ्यांमध्ये शिरलेली हवा सहजासहजी बाहेर पडत नाही. भूगर्भातील सक्षम पोकळ्यांचा वेध घेतल्यास ते शक्य आहे. पहिल्या पावसाचे गढूळ पाणी वाहून गेल्यावर नंतरचे पाणी गाळून भरण्याची व्यवस्था हवी. डोंगर उतार व माळरानांवरही सक्षम पोकळ्या शोधून कूपनलिका करायला हव्यात. पाझरलेल्या पाण्यामुळे जमिनीतील कृमी, गांडूळ यांसारखे जीव वाचतील व सेंद्रिय खताच्या निर्मितीला हातभार लागेल. तळी, धरणांमुळे होणारे बाष्पीभवन व पाण्याची गळती यात संभवत नाही. तसेच धरणाची खर्चिक निगराणी, गाळ साचणे या गोष्टीसुद्धा भूजलामुळे टाळता येतात. याचबरोबर पाण्याच्या बचतीसाठी ठिबक, तुषार सिंचनाचा वापर व्हावा.
- रघुनाथ सावे, नाशिक
शेतीसाठी नदीजोड आवश्यक
नदीजोड प्रकल्प हा व्यापारी धंदेवाईक, शहरी श्रीमंत यांच्यासाठी हितावह नाही, कारण त्यांना टंचाई हा शब्दच माहीत नाही. पण देशातील ८० टक्के लोकांना त्याची नितांत आवश्यकता आहे. धरण व पाटबंधाऱ्यांसाठी गावे, जंगलांची जमीन जाते. पण उद्योगधंदे व गावे जगविण्यासाठी खात्रीचे पाणी लागते. जमिनीत जास्त पाणी मुरावे म्हणून विशिष्ट अंतरावर खडकांना तडे जाण्यासाठी सुरुंगस्फोट करावेत. त्यामुळे भूजलात जास्त पाणी साठेल. त्यामुळे धरणांमध्ये पाणी साठविण्याची गरज भासणार नाही. या गोष्टींमुळे गावांचा र्सवकष विकास होऊन शेतकऱ्यांच्या आत्महत्यासुद्धा थांबतील.
- श्याम अढांगळे, कोपरखैरणे, नवी मुंबई
छोटे म्हणजे सुंदर
भव्यदिव्य विकास दाखविण्याचा प्रयत्न व निसर्गाला वाकविण्याची भाषा यातूनच नदीजोड प्रकल्प, समुद्राचे पाणी गोडे करण्याचे प्रकल्प जन्म घेतात. विकास म्हणजे कोटय़वधी रुपयांचे प्रकल्प अशीच व्याख्या बनली आहे, तिथे निधीच्या  ‘गळती’ची टक्केवारी छोटी असली तरी मुकलक ठरते. त्यामुळे छोटी-छोटी कामे विकासाची समजली जात नाहीत. पाण्याव्यतिरिक्त इतर वापरासाठी सांडपाणी शुद्ध करून वापरले तरी चालण्याजोगे आहे. भव्यदिव्य गोष्टींकडे लक्ष असल्यामुळे शहरांमध्ये वाया जाणाऱ्या २५-३० टक्के पाण्याकडे लक्ष जात नाही. देखभाल ही गोष्ट आपल्या संस्कृतीत नाही. नळाचे वॉशर न बदलल्याने बरेच पाणी वाया जाते.. आपले तारतम्य वापरून आवश्यक असेल तिथेच कोटय़वधी रुपयांचे प्रकल्प उभारावेत. ९० टक्के प्रकल्प स्थानिक पातळीवर, कमी वेळात व कमी खर्चात सोडविण्याचा प्रयत्न करणे. हेच खरे जलव्यवस्थापन!
- दत्ता परब, वाशी
लघुपाटबंधारे प्रकल्पांची आवश्यकता
मोठय़ा धरणांसाठी नैसर्गिक जागा उरलेल्या नसल्याने खर्चाचे अंदाजपत्रक वाढले आहे. त्यातच सिमेंट, लोखंड व इतर साहित्याच्या किमती वाढत असल्याने लघुपाटबंधारे प्रकल्पांची आवश्यकता आहे. धरण मोठे असेल तर शेकडो गावांच्या जमिनी पाण्याखाली जातात. पुनर्वसनाची प्रकिया किचकट असल्याने लोकांमधील असंतोष वाढतो व धरणाचे बांधकाम लांबते. त्यामुळेच लहान धरणे बांधावीत. धरणे बांधताना नदीच्या एका टोकाकडून सुरुवात करावी. मुख्य नदीच्या शेवटी, नंतर मध्यात व उगमस्थळी अशा क्रमाने ती बांधावीत. या उपायांमुळे पूरनियंत्रण परिणामकारकरीत्या अंमलात येईल. तसेच, पाण्याचा शेतीसाठी योग्य वापर, पुनर्वसनाचा प्रश्न, बांधकामाचा वेळ, पैसा या सर्व गोष्टींवर नियंत्रण येईल.
- अनिरुद्ध कोलखेडे, दर्यापूर, अमरावती
गाळ उपसा व वापरा
तलाव, धरणे, विहिरी, पाण्याचे प्रवाह यात गाळ साचत असल्याने पाण्याची साठवणूक कमी होते. त्यामुळे आधुनिक अवजारे वापरून हा गाळ काढावा. तो विटा, कौले, कुंडय़ा, मडकी तयार करण्यासाठी वापरता येईल. त्यातून अनेकांना रोजगार मिळेल. तो शेतकऱ्यांना जमिनीचा पोत वाढविण्यासाठी वापरता येईल. त्यामुळे रासायनिक खते वापरण्याची गरज भासणार नाही व उत्पादनही वाढेल. पात्राची खोली वाढत गेल्याने पाणीसाठा वाढेल व भूजलातही वाढ होईल. या कामासाठी शासकीय यंत्रणांवर विसंबून न राहता ग्रामस्तांनी एकत्र येऊन श्रमदानाने किंवा राष्ट्रीय सेवा योजनेच्या मदतीने करावीत. तसेच शिवारातील पाणीप्रवाहांची स्वच्छता यासारखी कामे डिसेंबर ते मे या काळात हाती घेतल्यास चार-पाच वर्षांमध्ये दूरगामी परिणाम दिसतील.
- विजय देवधर, पुणे
लोकसहभागातूनच विकास हवा
शासनाचे प्रयत्न लोकांच्या मागणीनुसार न झाल्याने पिण्याच्या पाण्याचे प्रश्न आजही आहेत. लोकांनाही या व्यवस्थांशी संबंध वाटत नाही. त्यामुळे आता जलस्वराज्य प्रकल्प हाती घ्यावा. त्यात सध्याच्या बंद योजनांचे पुनरुज्जीवन करून जुने स्रोत बळकट करावेत. नळकोंडाळ्यांची त्यांची संख्या वाढवावी व पाणी योजनेतील जुनाट पाईप दुरुस्त करावेत. गावात पाण्याची व्यवस्था निर्माण झाली तर त्याचे व्यवस्थापन व देखभालीची जबाबदारी पूर्णपणे गावाची राहावी. पाणी व स्वच्छतेच्या योजनांमध्ये महिलांचा महत्त्वाचा सहभाग राहील असे पाहावे, कारण कमी पाणी व अनारोग्याचा त्यांनाच जास्त त्रास होतो. लोकसहभागातूनच गावाचा व जलस्रोतांचा विकास करायचा आहे ही भावना समाजात रुजविण्यासाठी प्रयत्न व्हावेत.. अन्यथा जलव्यवस्थापन फसल्यास टंचाई वाढेल, टँकरची मागणी वाढेल व राजकीय मंडळींना चरण्यासाठी आयते कुरण मिळेल.
- विवेक ढापरे, कराड

गावोगावी पाणलोट कार्यक्रम
गावोगावी पिण्याच्या पाण्यासाठी कोटय़वधी रुपयांची तरतूद केली जाते, पण पाणीउपसा, वापर व व्यवस्थापन याचा मेळ घातला जात नाही. गावोगावी नळयोजना असताना वर भूजल उपसण्याची मोकळीक कशासाठी? टंचाईवर उपाय म्हणून गावोगावी पाणलोट विकास प्रकल्प धडाक्यात हाती घ्यावेत. नदीजोडसारखे अवाढव्य प्रकल्प केवळ भ्रष्टाचाराचे कुरण ठरतील.
- दिवाकर गांजरे, धामणगाव-रेल्वे

जलव्यवस्थापनात महाराष्ट्र  मागास
पाण्याचा गैरवापर, अतिवापर व नासाडीची असंख्या उदाहरणे आहेत. महाराष्ट्रासारखे पुरोगामी राज्य याबाबत मागासलेलेच आहे. यावर लोकांमध्ये जागृती हाच उपाय आहे. डोंगर-टेकडय़ा खासगीकरणातून हिरव्या करणे, शेतीसाठी ठिबकसिंचन व पीकप्रकार ठरविणे, पाणी जिरविणे, धरणातील गाळ सरकारतर्फे शेतकऱ्यांना ट्रॉलींमध्ये भरून देणे, शहरात ‘रेन वॉटर हारवेस्टिंग’ व पाणी मोजून देणे, उद्योगांना जलशुद्धीकरण सक्तीचे करणे हे उपाय आवश्यक आहेत. त्यासाठी स्वाध्याय परिवार, वारकरी, रामदेवबाबा यासारख्या गटांचे सहकार्य घ्यावे.
बी. एल. मगर, नाशिक

जलव्यवस्थापनाचे आव्हान
या विषयावर ‘भवताल’च्या व्यासपीठावर मागविलेल्या मतांना वाचकांकडून भरभरून प्रतिसाद मिळाला. बहुतांश पत्रांमध्ये नेमक्या पद्धतीने समस्येचा वेध घेण्यात आला व विस्तृत उपाययोजनाही सुचविण्यात आल्या. मात्र, जागेचे बंधन असल्याने त्यापैकी काही प्रतिक्रिया संक्षिप्त स्वरूपात देत आहोत.

जलक्षेत्राची पेचप्रसंगाकडे वाटचाल हेतुत:?
असंख्य छोटेमोठे सिंचन प्रकल्प उभारून ‘पाणी अडविण्याची लढाई’ आपण जिंकली खरी, पण ‘जल व्यवस्थापनाच्या तहात’ मात्र हरलो आहोत.
१) सिंचन प्रकल्प आता फक्त सिंचनासाठी राहिले नाहीत. ते आता सर्व प्रकारच्या वापराकरता एकाच स्रोतातून पाणी देणारे पायाभूत प्रकल्प बनले आहेत. सार्वजनिक क्षेत्रातल्या या पाणी प्रकल्पांचे व्यवस्थापन २१ व्या शतकाला साजेसे करण्यात आपण कमी पडत आहोत. २)धरणे बांधली, पाणी अडले व कालवे काढले म्हणजे ‘प्रकल्प पूर्ण झाले’ असे होत नाही. काही महत्त्वाच्या तांत्रिक, सामाजिक, आर्थिक व कायदेविषयक प्रक्रियाही जाणीवपूर्वक पूर्ण केल्या गेल्या तरच प्रकल्प खऱ्या अर्थाने पूर्ण होतो. आपले बहुसंख्य प्रकल्प या अर्थाने अपूर्ण असल्याने त्यांचे अपेक्षित लाभ मिळत नाहीत. त्यामुळेच पाणी वाटपातील विषमता, अकार्यक्षमता, अराजकता व संघर्ष वाढत आहेत. ३) पाणीविषयक कायद्यांच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीकडे दुर्लक्ष झाले आहे. महाराष्ट्र पाटबंधारे अधिनियम १९७६ (मपाअ ७६) तत्त्वत: अमलात येऊन ३३ वर्षे झाली तरी अद्याप त्याचे नियम झालेले नाहीत. आपण एकविसाव्या शतकातही मुंबई पाटबंधारे अधिनियम १८७९ वर आधारित मुंबई कालवे नियम १९३४ वापरत आहेत. ४) प्रारंभिक सिंचन कार्यक्रम (पीआयपी) न करणे, केला तर त्याला रितसर मान्यता न मिळणे, प्रत्यक्ष पाणी वाटप पीआयपीप्रमाणे नसणे हे सर्व प्रकार आता अपवाद राहिले नसून, नियमच झाले आहेत. शेतकऱ्यांना पाणी मिळणे हा पूर्वनियोजित पाणीवाटप कार्यक्रमाचा परिणाम नसून, एक अपघात झाला आहे. ५) विविध प्रकारे होणारा पाणीवापर व भिजणारे क्षेत्र प्रत्यक्ष न मोजता आणि त्यासंदर्भात विश्वासार्ह दफ्तर उपलब्ध नसताना जललेखा (वॉटर ऑडिट) व बॅच मार्किंग करून आधुनिकतेचा फक्त एक आभास निर्माण होत आहे. ६) पाणीवापर व पीकवार क्षेत्र याबाबतचा खरा तपशील उपलब्ध नाही. पाणीपट्टी आकारणी व वसुली करणारी यंत्रणा कमकुवत आहे. अनुभवी व प्रशिक्षित कर्मचारी पुरेशा संख्येने नाहीत. वसुलीचे प्रमाण कमी आहे. अंदाजे सातशे कोटी रुपये थकबाकी आहे. राजकारणापोटी वारंवार पाणीपट्टी माफ केली जाते. ७) कालव्यांच्या देखभाल-दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत आहे. त्यासाठी अनुभवी व प्रशिक्षित कर्मचारी पुरेशा संख्येने नाहीत. कालव्याची वहनक्षमता निम्म्यावर आली आहे. ते वारंवार फुटत आहेत. पाणी वाया चालले आहे. कालवामुखाशी सोडलेल्या पाण्यापैकी जेमतेम २०-२५ टक्के पाणी पिकाच्या मुळापर्यंत कसेबसे पोहोचते. पाण्यावर नियंत्रण ठेवायला दारे नाहीत. असली तर नादुरुस्त व गळकी, पाणी मोजायला साधने नाहीत. ८) हे मुद्दे नवे नाहीत. महाराष्ट्र जल व सिंचन आयोगाच्या १९९९ सालच्या ऐतिहासिक अहवालाने दहा वर्षांपूर्वीच जलक्षेत्राला आरसा दाखवला आहे. त्याकडे शासन व समाज दोघांनी पराकोटीचे दुर्लक्ष केले.
तात्पर्य, जलक्षेत्राची वाटचाल अभूतपूर्व पेचप्रसंगाकडे होत आहे. हे केवळ दुर्लक्ष समजायचे का असेच व्हावे हाच खरा हेतू आहे?
- प्रा. प्रदीप पुरंदरे, ‘वाल्मी’, औरंगाबाद

’ मोठय़ा धरणांऐवजी गाव व विभाग पातळीवर पाणी अडवावे. डोंगरातून निघणाऱ्या ओढय़ांवर छोटे-छोटे बंधारे बांधावे. गावाजवळच्या ओढय़ावर भौगोलिक रचनेनुसार बंधारा घालून पाणी साठवावे. त्याचे संपूर्ण व्यवस्थापन ग्रामपंचायतीकडे असावे.
- प्रा. बी. के. माने, इस्लामपूर, सांगली
’ सर्व नद्यांचा मार्ग नैसर्गिकच असावा. पात्रातील गाळ वेळोवेळी काढावा. नदीत दूषित पाणी सोडणाऱ्या कारखान्यांचे परवाने रद्द करावे. बाटलीबंद पाण्यासाठी कंपन्यांनी किती भूजल उपसावे यावर बंधन हवे. नदीपात्रात मेलेली जनावरे व माणसाच्या अस्थि विसर्जित करू नयेत.
- कमलाकर पंडित, गिरगाव, मुंबई
’ राज्या-राज्यात पाण्यावरून समस्या निर्माण होऊ नयेत म्हणून राज्याने आपापल्या क्षेत्रात पडणाऱ्या पाण्याचे व्यवस्थापन करावे. पाण्याचे नियोजन व व्यवस्थापन लोकांकडूनच व्हावे.
- कीर्तिकुमार वर्तक, वसई, ठाणे
’ भात, गहू, ऊस अशा विविध पिकांना किती पाणी लागते, याचा अभ्यास व्हावा. समुद्राच्या पाण्यावर प्रक्रिया करून ते शेती व पिण्यासाठी वापरावे. पाणी साठवताना त्याच्या बाषअपीभवनाबाबत विचार व्हावा.
- सां. रा. वाठारकर, चिंचवड, पुणे
’ १. भारताचा संपूर्ण किनारी भाग कमी उंचीचा आहे. हिमालयातील जलकालव्यांनी उंच भाग टाळून दक्षिणेत पाणी आणण्याचा विचार व्हावा. २. राजमहल टेकडय़ा व हुगळी भागातील पाणी बंद नळाने समुद्रातून दक्षिणेकडे आणणे शक्य होईल. ३. उत्तर भारतात वाया जाणारे पाणी पूर्वेकडून पश्चिमेकडे नेण्याचा प्रयत्न करणे.
- मुरलीधर जावडेकर, पिंपरी, पुणे
’ भारतातील लोहमार्ग व महामार्गाचे जाळे जी.आर.पी. रेल्वे सारख्या कंपन्या स्थापून देशभर निर्माण केले. त्याप्रमाणेच अभियांत्रिकी कंपन्या स्थापून नद्यांचा जोडणी प्रकल्प हाती घ्यावयास हवा होता. परंतु, केंद्राने तो बासनात गुंडाळला. घरांवर पडणारे पावसाचे पाणी संकलन करणाऱ्या योजना नदीजोड प्रकल्पाइतक्यात महत्त्वाच्या आहेत.
- श. म. केतकर, पुणे
’ शेतकरी, कृषी विद्यालयातील पदवीधर व कार्यकर्त्यांना प्रशिक्षित करून ‘लोकसत्ता’त प्रसिद्ध झालेल्या शिरपूर तालुक्यातील प्रयोगांप्रमाणे कामे झाली तर जलव्यवस्थापन व्यवस्थित होईल व दुष्काळाचा मागमूसही राहणार नाही.
- स्मिता दत्तात्रय पाटील, बोरिवली, मुंबई
’ चीन हिमालयातील पाणी वळवून घेत आहे. सिंधू गेली, तशाच ब्रह्मपुत्रा व गंगा जातील. त्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर आपला पाण्याचा हक्क जाहीर करावा, एकदा हातून गेलेले पाणी परत मिळत नाही. त्यामुळे सरकारने नदीजोड प्रकल्प हाती घ्यावा यासाठी लोकांची चळवळ उभारावी.
- सुहासिनी पोळ, औरंगाबाद
’ वाहते पाणी थांबते करा. नद्या-नाल्यांवर बांध घालून असे यशस्वी प्रयत्न धुळे जिल्ह्य़ातील शिरपूर व गुजरातमधील सौराष्ट्रात झाले आहेत. त्यामुळे भूजलात झालेली वाढ व शेतकऱ्यांची झालेली समृद्धी पाहता असे प्रयोग सर्वत्र व्हावेत.
- दत्ता देशकर, औरंगाबाद
’ संपूर्ण लोकसंख्येला पुरेल इतके पाणी भारतात आहे. पण नदीजोड हा उपाय नाही. त्याऐवजी कोल्हापुरी पद्धतीचे बंधारे बांधणे, पाण्याचे उद्योग-शेती-पिण्यासाठी यांचे योग्य वाटप, गळती रोखणे हे उपाय व्हावेत. नदीजोडच्या तुलनेत बंधाऱ्यांसाठी खूपच कमी खर्च येतो.
- सागर बोरुडे, अहमदनगर
’ नदीजोड प्रकल्प आवश्यकच आहे. त्यासाठी तज्ज्ञांची समिती नेमून नियोजनबद्ध आराखडा जनतेसाठी खुला करावा व त्यांची मते मागवावीत. अशा उचित विचारमंथनानंतर तो प्रत्यक्षात आणावा.
- डॉ. संजय गोरे, माळशिरस, सोलापूर
’ इतर अनेक उपायांबरोबरच कमी पाण्यावर येणारी पिके घ्यावीत. भूजल उपसण्यावर र्निबध हवेत. जलाशयातील बाष्पीभवन रोखण्यासाठी उपाय व्हावेत.
- विश्वास काळे, नागोठणे, रायगड
’ ५,६०,००० कोटी रुपये गुंतवणुकीच्या नदीजोड प्रकल्पाऐवजी रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून गावपातळीवर जलसंधारणाची कामे हाती घ्यावीत. त्यामुळे भूजल पातळी वाढेल.
- महीपत नवलडे, टेंभुर्णी, सोलापूर
’ नद्या राष्ट्रीय संपत्ती म्हणून घोषित कराव्या. म्हणजे विकासाची फळे एका राज्याला व दुसरीकडे दुष्काळ हे चित्र बदलेल.
- रजनी अशोक देवधर, ठाणे
’ नदीजोड प्रकल्पाकडे सकारात्मक दृष्टीने पाहावे.
- सुधीर देशपांडे, विलेपार्ले, मुंबई
’ शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या श्रमदानातून भूजल उंचविण्यासाठी पंचवार्षिक कार्यक्रम हाती घ्यावा.
- र. शं. गोखले, ठाणे
’ पाण्याची गळती रोखूनही मोठय़ा प्रमाणावर पाण्याचा अपव्यय टाळणे शक्य आहे. त्यासाठी इच्छाशक्ती आवश्यक आहे.
-  मनोज वैद्य, डोंबिवली, ठाणे
’ पाणी ही दैवी संपत्ती मानून प्रत्येक पावसाचे पाणी अडवावे.
- डी. सी. जोन्स, तळेगाव, पुणे
’ पर्यावरण व जलसाक्षरता हे विषय पहिल्यापासून अभ्यासक्रमात असावेत. शासन सुस्त असेल तर लोकांनी आवाज उठवून झोप उडवावी.    - अशोक आफळे, कोल्हापूर

साभार- लोकसत्ता

http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=35401:2009-12-28-15-46-06&catid=96:2009-08-04-04-30-04&Itemid=108