
'श्री गणेश '
विघ्नहर्तार् गणेशाचे मोठ्या धुमधडाक्यात आगमन झाले. घरोघरच्या गणपतीं सोबत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमध्येही श्रीं च्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठापना होत आहे. गणपती हे आपले आराध्य दैवत. सर्व कला शास्त्र, विज्ञानाचे त्याला अनुष्ठान. गणेशोत्सव हा समाज सुखाचा ठेवा. ऐक्याचे प्रतिक. समाजस्वास्थ्याचा आरसा. परंतु, गेल्या काही वर्षांपासून खोट्या कल्पना, मोठमोठ्या वल्गना यांमुळे प्रत्येकालाच भव्यतेची आस लागली आहे. त्यामुळे या उत्सवात पर्यावरणाची प्रचंड हानी होत असून, त्याकडे दुर्लक्ष केले जाते. हीच हानी रोखण्यासाठी धामिर्क, सामाजिक, सांस्कृतिक अशा अनेक क्षेत्रांत बहुमोल योगदान असलेला गणेशोत्सव पर्यावरणस्नेही करण्याचा ध्यास ठाण्यातल्या पर्यावरणप्रेमींनी एका दशकापुवीर् घेतला. या उत्सवाशी धामिर्क भावना जोडलेल्या असल्याने सुरुवातीला या मंडळींना टोकाच्या विरोधाचा सामना करावा लागला. परंतु, पर्यावरण रक्षणाचा मंत्र त्यांनी सोडला नाही. कागदाचा लगदा किंवा शाडूच्या मातीपासून तयार केलेल्या मुर्ती, धातूच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठापना, इको फ्रेंडली मखर, कृत्रिम तलावांमधले मुर्तीचे विसर्जन, निर्माल्यापासून खत निमिर्तीर् अशा अनेक मार्गाने या पर्यावरण स्नेही गणेशोत्सवाची मुळे ठाणेकरांच्या मनात रुजविण्यास सुरुवात झाली. उशिरा का होईना हा विचार ठाणेकरांमध्ये रुजलाय. ठाण्याच्याच पावलावर पाऊल ठेवून अनेक शहरे आता ‘इको फ्रेंडली’ गणेशोत्सवाची बिजे रोवत आहेत.
गणपतीच्या मुर्ती प्लास्टर ऑफ पॅरिसच्या असतात. त्यामुळे विसर्जनानंतरही त्या पाण्यात विरघळत नाही हे वैज्ञानिक सत्य आहे. तलावांचे शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ठाण्याला या विसर्जनाचा सर्वात मोठा फटका बसत होता. प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मुर्तीमुळे तलाव बुजत चालल्याचे धक्कादायक वास्तव १९९८ साली सरस्वती सेकंडरी शाळेच्या मुलांनी एका सवेर्क्षणातून उघड केले होते. १९९३ साली मासुंदा तलावातला सगळा गाळ उपसण्यात आला होता. त्यावेळी या तलावाची खोली १८ फूट होती. १९९८ साली जेव्हा शाळकरी मुलांनी या तलावाचा सव्हेर् केला, त्यावेळी या तलावाची खोली १० फुटांवर आली होती. पाच वर्षांत आठ फुटांचा प्लॅस्टर ऑफ पॅरिसचा गाळ तलावात साठला होता. याच वषीर् तब्बल २२ टन प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मुर्तीचे विसर्जन ठाण्यातल्या तलावांमध्ये झाले होते. त्यात १ हजार १४४ किलो रंग होता. प्लॅस्टर ऑफ पॅरिसमधील कॅल्शियम आणि फॉस्फरसमुळे पाण्यातील वनस्पतींची वाढ खुंटते. रंगातल्या पाऱ्याचे कण माश्यांच्या कल्ल्यांमध्ये गेल्याने श्वसनक्रिया बंद पडून ते मृत्यूमुखी पडतात. हे मासे लोकांनी खाल्ले तर मानवी मेंदूवर अनिष्ट परिणाम होण्याची भीती असते. त्याशिवाय गणेश मुर्तीत जिप्सम हा घटक अविघटनशील असतो. त्यामुळे या मुर्ती पाण्यात विरघळत नाही. उन्हाळ्यात अनेक ठिकाणचे तलाव कोरडे पडल्यानंतर गणपतींच्या भंगलेल्या मुर्ती दृष्टीस पडतात.
गणेशमुर्तीचा आकार व वजनाच्या कितीतरी पट फुलांचे, कागदाचे, प्लास्टिक वा तत्सम कृत्रिम घटकांचे हार, तुरे निर्माल्य म्हणून तलावात टाकले जाते. कागद व फुले नैसगिर्क असतील तर त्यांच्या विघटनातून तयार होणारे सेंदिय पदार्थ पाण्याची भौतिक, रासायनिक घटना सुधारणारे व जैविक घटकांना पोषक ठरतात. परंतु, फुलांचे प्रमाण एवढे प्रचंड असते की, त्यामुळेही पाण्याचे स्वास्थ्य बिघडते. तर, प्लास्टिकच्या पिशव्या तलावाच्या विनाशाला कारणीभूत ठरतात. अनेक ठिकाणी थर्माकोलची आरास केली जाते. परंतु, या थर्माकोलचे जैविक-रासायनिक विघटन होत नाही. त्याचे तुकडे माशांसाठी आणि तलावातल्या जीवसृष्टीसाठी घातक ठरतात. या घटकांमुळे पर्यावरणाचे प्रचंड नुकसान होत होते. हा ऱ्हास केवळ ठाण्यापुरताच मर्यादित नसून राज्यातल्या सर्वच शहरांना ही समस्या भेडसावत आहे. परंतु, त्यातून मार्ग काढण्यासाठी ठाणेकरांनी पुढाकार घेतला ही या शहरासाठी अभिमानाची गोष्ट आहे.
१९९७ साली जिज्ञासा, पर्यावरण दक्षता मंच, हरियाली या संस्थांनी पर्यावरण स्नेही गणेशोत्सवासाठी पुढाकार घेण्यास सुरुवात केली. धामिर्क भावनेचा संबंध असल्याने जबरदस्ती करून उपयोग नव्हता. त्याचा प्रत्यय या संस्थांना पहिल्याच वषीर् आला. गणेशमुर्तीचे तलावात विसर्जन न करता तलावाभोवती निर्माण केलेल्या विहिरी किंवा कृत्रिम तलावांमध्ये करा, अशी विनंती राजकारण्यांनी धुडकावून लावली. त्यामुळे हळूहळू समाजप्रबोधन करून या विषयाचे गांभीर्य ठाणेकरांना समजावून देण्यास सुरुवात झाली. त्याचे परिणाम गेल्या दोन-तीन वर्षांपासून दिसू लागले आहेत.
आमची गणपतीची मुर्ती या वर्षी अत्यंत छोटी आहे. आम्ही घरातल्या धातूच्या मुर्तीर्मध्येच प्राणप्रतिष्ठा केली आहे. आमच्या सजावटीमध्ये प्लास्टिक आणि थर्माकोलचा वापर केलेला नाही, असे सांगणारे अनेक जण आज ठाण्यात भेटतात. हे पर्यावरणस्नेही गणपती पुजक इको फ्रेंडली गणेशोत्सवाचा प्रचारकच ठरत आहेत. गणपती उत्सवाला बक्षिस मिळावे या हेतूने निर्माल्याचे कंपोस्टिंग प्रकल्प सुरू झाले. वृक्षारोपण मोहिमा सुरू झाल्या. मातीच्या गणपतींचे कारखाने शोधणाऱ्यांची संख्या वाढली. इको फ्रेंडली गणेशमुर्ती करण्याच्या वर्कशॉपला उदंड प्रतिसाद मिळू लागले. कागद आणि पुठ्ठ्यापासून तयार कलेल्या मखरांची निमिर्ती आणि मागणी वाढली. मुर्तीची उंची वाढविण्याचा सोसही कमी झालाय. तलावातल्या प्रदुषणाची प्रक्रिया थांबविण्यासाठी पर्यावरणस्नेही संस्थांच्या पाठपुराव्यामुळे ठाणे महापालिकेने गणेश विसर्जनासाठी कृत्रिम तलाव उभारण्याचा धाडसी निर्णय घेतला. या योजनेला सुरुवातीला झालेला विरोध आता मावळला आहे. गेल्यावषीर् शहरातल्या दीड, पाच आणि सात दिवसांच्या सुमारे ७० टक्के गणेशमुर्तीचे विसर्जन या कृत्रिम तलावांमध्ये झाले होते. उत्तरपुजेनंतर मुर्ती महापालिकेकडे दान करण्याची योजनाही ठाण्यात सुरू झाली होती. दान केलेल्या या मुर्तीचे खाडीच्या पाण्यात विधीवत विसर्जन केले जाते. त्यालाही उदंड प्रतिसाद मिळतोय. सर्वत्र सुरू असलेली इको फ्रेंडली गणेशोत्सवाची हाकाटी ठाणेकरांच्या पचनी पडू लागली. बुद्घिदात्याच्या कृपेने लोकांच्या मानसिकतेत झालेला हा बदल निश्चितच पर्यावरणवादी संस्थांचा उत्साह वाढविणारा आहे.
गणेश मुर्ती शाडूच्या असाव्यात. आकार लहान असल्यास किंमतीही आवाक्यात राहता. छोट्या मुर्तीचे विसर्जनही सुरळीत होते. हे लोकांच्या मनावर बिंबविण्यात या संस्थांना यश आले आहे. त्यामुळेच यंदा एक हजार घरांमध्ये शाडू किंवा कागदी लगद्यापासून तयार केलेल्या गणेशमुर्तीची प्रतिष्ठापना होत आहे. थर्माकोलच्या मखरांना रामराम ठोकत अनेकांनी फुले, कागद, पुठ्ठा अशा तत्सम विघटनशील घटकांची आरास केली आहे. आरास बडेजावासाठी नसून ती गणेशाभोवती प्रसन्नता निर्माण करण्यासाठी असते हे लोकाना आता समजू लागले आहे. फुले, कागद, प्लास्टिक, थर्माकोल, प्लास्टर ऑफ पॅरिस, थर्माकोल इतर अनेक पदार्थ पाण्यात मिसळणे हे पुर्णत: मानवनिमिर्त आहे. याला आळा घालणे सहज शक्य आहे हे समजल्यानंतर निर्माल्य तलावात न टाकता पालिकेच्या निर्माल्य कक्षात जमा केले जाणार आहे. या निर्माल्यापासून नंतर खत तयार होणार आहे. गणेशोत्सवाचे इकोपरिवर्तन करण्याचे ठाण्यातले प्रयत्न हे मैलाचा दगड ठरणार आहेत. ठाण्यापाठोपाठ मुंबई, पुणे, नाशिक, कोल्हापूर अशा अन्य शहरांतही इको फ्रेंडली गणेशोत्सवाचे पडघम वाजू लागले आहेत. त्या प्रयत्नांना अपेक्षित यश लाभले, तर गणपतीच पर्यावरण रक्षणाचा अग्रदूत म्हणून उपयोगी पडेल.
साभार महाराष्ट्र् टाइम्स
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/4923298.cms
Recent Comments