Archive for November, 2008
राम तेरी गंगा-यमुना मैली….! (साभार- संपदकीय, लोकसत्ता, गुरुवार २७ नोव्हेंबर २००८).
दिल्लीत निर्माण होणारे सांडपाणी यमुना नदीत मिसळत असल्याबद्दल ‘दिल्ली जल बोर्डा’चे माजी कार्यकारी अधिकारी अरुण माथुर व दोघा वरिष्ठ अभियंत्यांना दिल्ली उच्च न्यायालयाने दोन आठवडे कारावासाची शिक्षा ठोठावली आणि एकट्या राजधानीतीलच नाही तर देशभरातील सर्वच शहरांच्या बेफिकीर प्रशासनांना एका अर्थाने परिणामांना तयार राहायचा इशाराच दिला. दिल्लीतील सांडपाणी यमुनेत मिसळणार नाही, याबाबत न्यायालयाला आश्वासन देऊनही ते करण्यात अपयश आल्याबद्दल न्यायमूर्ती शिवनारायण धिंग्रा यांनी ही शिक्षा सुनावली. याचबरोबर शिक्षा सुनावलेल्या तीनही अधिका-याच्या पगारातून प्रत्येक वीस हजार रुपयांचा दंड तातडीने वसूल करण्याचा आदेशही दिला. त्यांच्या दॄष्टीने दिलासा एवढाच की, कारावासाची शिक्षा तीन महिन्यांसाठी स्थगित करण्यात आली आहे. या काळाय स्थिती सुधारली तर ही शिक्षा माफ होऊ शकेल, अन्यथा नदी प्रदूषित केल्याबद्दल अशा उच्चपदस्थांवर अशाप्रकारे शिक्षा भोगण्याची वेळ भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच येणार आहे. शिक्षेची टांगती तलवार असल्याने सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याच्या कामाला कदाचित प्राधान्य मिळेल आणि ख-या अर्थाने गटार बनलेल्या यमुनेची स्थिती सुधारेलही, पण न्यायालयाच्या आदेशाने सध्या तरी प्रशासनाची झोप उडवली आहे, हे निश्चित ! हा स्वागतार्ह निर्णय योग्य वेळी आला आहे. सरकारतर्फे गंगेला ‘राष्ट्रीय नदी‘ चा दर्जा देण्याचा निर्णय घेण्यात आला. हा दर्जा देऊन या नदीचे प्रदूषण दूर करण्याचे व तिचे स्वास्थ्य सुधारण्याचे ठरविण्यात आले. गंगेला सर्वाधिक प्रदूषण कोण करत असेल तर ती यमुना ! त्यामुळे यमुना
सुधारली तरच गंगा सुधारण्याची शक्यता आहे. दिल्ली न्यायालयाच्या आदेशाने यमुना सुधारण्याबाबत आशावाद निर्माण झाला आहे. त्याचा फायदा स्वाभाविकच ‘राष्ट्रीय नदी’ होऊ घातलेल्या गंगेला होणार आहे. त्यामुळेच हा योगायोग किंवा ही वेळ नेमकी जुळून आली आहे. हा आदेश अतिशय परिणामकारक ठरणार आहे. तो राजधानीत दिला गेला असला, तरी त्याचे धक्के देशभर जाणवतील आणि आतापर्यंत सुस्त असलेल्या सर्वच शहरांच्या प्रशासनाला गदागदा हलवतील. कारण यमुनेला दिल्लीतील सांडपाण्याचा रोग जडला आहे, तसाच तो देशातील सर्वच नद्यांना जडला आहे, मग त्या दक्षिणेतील कावेरी-पेरियार असोत, पश्चिमेतील नर्मदा-साबरमती, पूर्वेकडील महानदी, मध्य भारतातील क्षिप्रा-चंबळ नाहीतर आपल्याकडील कॄष्णा-गोदावरी! प्रदूषणामुळे सर्वच नद्या विषवाहिन्या बनल्या आहेत. बहुतांश नद्या पावसाळा वगळ्ता केवळ सांडपाणी व कारखान्यांमधील घाणच घेऊन वाहतात. मँगसेसे पुरस्कार विजेते राजेंद्रसिंह राणा यांनी सहा वर्षांत केलेल्या देशातील प्रमुख १४४ नद्यांच्या सर्वेक्षणाचा आधार घेतला, तर तीन-चतुर्थांश नद्यांचे पाणी पायावर घ्यायच्याही लायकीचे उरलेले नाही. काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत आणि कच्छपासून अरुणाचल प्रदेशपर्यंत सर्वच नद्यांना या दुर्दैवाने घेरले आहे; अपवाद आहेत पण अगदीच मोजके! आपला महाराष्ट्रसुध्दा याला अपवाद नाही, किंबहुना इतरांपेक्षा अधिक औद्यौगिक
‘विकसित’ राज्य असल्याने इथल्या नद्या, त्यातील परिसंस्थांचे अस्तित्व जवळजवळ संपुष्टात आले आहे. ही माहिती कोणत्या सरकारी किंवा स्वयंसेवी संस्थेच्या अहवालावर आधारित नाहि, तर प्रत्यक्ष ‘लोकसत्ता’ तर्फे उळ्यात राज्यातील नद्यांचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यात आढलेले हे वास्तव आहे. क्रुष्णा, गोदावरी, पंचगंगा, तेरणा, पांजरा, मांजरा, वैनगंगा, पुर्णा, इरई… कोणतीही नदी पाहीली तरी तीची हीच अवस्ता आहे. त्यांच्या पात्रातील जैवविविधतता संपुष्टात आली अहे. प्रदुषणामुळे जगोजागी मासे मरण्याच्या घटना घडत आहेत. स्थानिक मशाच्या अनेक जाती नष्ट होत अहेत. त्या मुळे नदीकाठी असूनही पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष आहे. नद्यांमधून वाहणारे सांडपाणीच शेतीसाठी वापरले जात आहे. परिणामी जमिनी नष्ट होत आहेतच, शिवाय आरोग्याच्या भंयकर समस्याही उभ्या रहील्या आहेत. या समस्यानां विषमतेचा पदरही आहे. बलदंड शहरे नदीचे पाणी हवे तसे वापरत आहेत आणि आपण केलेली घाण पुन्हा नदीत सोडून मोकळी होत आहेत. त्यांची ही घाण खावी-प्यावी लागत आहे, पुढे असलेल्या लहान गावांना आणि गरीब वसाहतींना ! महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रन महामंडळाने सरकारला अलीकडेच सादर केलेल्या महितीनुसार, माहाराष्ट्रातील २२ महानगर पालिकांमधून दररोज तब्बल ५४० कोटी लीटर सांडपाणी बाहेर पडते, त्यापैकी केवळ १६ टक्के सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याची क्षमता या शहरांकडे आहे. म्हणजे प्रतेक सहा लीटर सांडपाण्यापैकी पाच लीटर सांडपाणी जसेच्या तसे बाहेर पडते आणि नद्यां नासविण्याचे काम करते. नगरपालिका असलेल्या मध्यम स्वरूपाच्या शहरांची अवस्ता तर याहून भीषण आहे. या शहरांमधून तब्बल पाचशे कोटी लीटर सांडपाणी बाहेर
पडते आणि त्यापैकी केवळ एक टक्क सांडपाणी शुध्द करण्याची त्यांची क्षमता आहे. म्हणुनच दिल्ली न्यालयाने यमुनानदीचे प्रदुषण होत असल्याबद्दल दिलेला निर्णय महाराष्ट्रातील शहरांच्या प्रशासनाचीसुध्दा झोप उडविणारा आहे, झोपलेल्यांची किंवा झोपेचे सोंग घेतले असेल त्यांचीसुध्दा ! दिल्ली न्यायालयाप्रमाणे महाराष्ट्रातील नद्यांच्या स्तितीबाबत आदेश दिले गेले, तर महाराष्ट्रातील सर्व नगरपलिका व महानगरपलिकांच्या अधिका-यानां एकाच वेळी तुरूंगात डांबावे लागेल. नुसतेच अधिका-यानां नाही तर सत्तेत असणा-यांना आणि त्याचे फायदे उठविणा-या नगरसेवकांना व नेत्यांनासुध्दा त्यासाठी जबाबदार धरावे लागेल. सामान्य जनता व कार्यकर्त्यांनी या मुलभूत प्रश्नांबाबत कितीही आवाज उठवला तरी टक्केवारी, टीडीआर, विकास आराखडयात फेरफार, नदीनाल्यांमधील अतिक्रमणांना संरक्षण अशा उद्योगांमध्ये गुंतलेल्या या ‘सेवका’पर्यंतही नद्या बिघडवण्याचे ‘पाप’ पोहचतेच. तेच खरे या बिघाडाचे कर्ते-सवरते आहेत. शहरे, महानगरांच्या घाणीप्रमाणेच बडया-बडया नेत्यांचे साखर कारखाने, त्यांनी कढलेल्या किंवा त्यंच्या अनेक डिस्टिलरी, पुण्यापसून ते विदर्भापर्यंतचे वादग्रस्त कागद कारखाने, अनेक रासायनिक उद्योग नद्यांना ‘मैली’ करण्यात त्यांच्या स्वास्थ्याचा लचका तोडण्यात मोठा वाटा उचलत आहेत. कोल्हापूर-सांगली-नगर अशा पश्चिम महारष्ट्रातील पट्टयतील साखर कारखाने काय, नशिकमधिल डिस्टिलरी काय, महाड-उल्हासनगर-नवी मुंबई परिसरातील रासायनिक उद्योग काय किंवा विदर्भातील कागद कारखाने
काय नद्यांना दूषित करणा-या अशा असंख्य उद्योगांची उदाहरणे जागोजागी आहेत. त्यांनी टाकलेली घाण उघडया डोळ्यांना दिसतेसिध्दा ! पण त्यांचे मालक,संचालक असलेल्या किंवा त्यांना संरक्षण देणा-या ‘जबाबदारा नेत्यांना’ मात्र ते दिसत नाही. असंख्य गावांमधील लोकांना या पाण्यावाटे ‘अँसिड’च प्यायची वेळ आली आहे. सांगली-कोल्हापूरच्या पट्टयात तर वर्षांनुवर्षे असे पाणी प्यायल्याने या पाण्याला लोक सरावले आहेत.पण ‘जनाची नव्हे तर मनाची’सुध्दा कोळून प्यायलेल्यांना त्याची काय पर्वा ? इतकेच कशाला ? नद्यांना म्रुत्युपंथाला लावणारे ‘वाळूमफिया’ तर सर्वच नेत्यांचे कर्यकर्ते आहेत. त्याला कोणत्याही पक्षाचा अपवाद नाही. वानगीदाखल म्हणून पुणे किंवा नगर जिल्हयातील स्थिती संगायची तर ग्रामीण भागात हे माफिया वर्षांनुवर्षे या नेत्यांना मनगटाची ताकद पुरवत आले आहेत. म्हणूनच तर एकमेकांच्या विरोधात निवडणुका लढवणारे नेतेसुध्दा नदीतून वाळू उपसण्यासाठी एकत्र असतात. मग ही वाळू शंभर ब्रास परवाना मिळवून हजार-दहाहजार ब्रास उपसली जाते किंवा एखाद्या नदीपात्रातील लिलाव बंद असतील तर परवान्याविनासुध्दा ! ही स्थिती पहाता नद्यांची स्थिती चांगली राखण्याबाबत न्यायालये सक्रिय झाली तर कोणाकोणाला आणि किती काळासाठी तुरुंगात डांबावे लागेल, याची कल्पणा येइल. त्यातुन अपवादानेच एखादा नेता किंवा कारखानदार सुटेल. दिल्ली न्यायालयाच्या निर्णयाने खंरतर आशावादी वातावरण निर्माण होणार आहे. न्यायालयाने सक्रियपणे त्याची सुरवात केली आहे. पण केवळ न्यायालयाच्या प्रयत्नांनी चित्र पालटणार नाही. आता जनतेने तसेच, नद्यां, पर्यावरण आणि त्यायोगे स्वत:च्या भविष्याची काळजी असलेल्या सर्वांनीच
नद्यांना मरणासन्न अवस्थेतून बाहेर काढण्यासाठी हातपाय हलविण्याची गरज आहे. महाराष्ट्राचा विचार करायचा तर राज्यभरातील जनतेला त्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतील. कारण आता वेळ आली आहे- नद्यां बिघडवणारे, त्यांना संरक्षण देणारे अशा सर्वांनाच खडसावून जाब विचारण्याची ! ते जुमानत नसतील तर
प्रत्यक्ष आंदोलनांद्वारे किंवा न्यायालयीन लढाईचा मार्ग हाताळून अधीक आक्रमक होण्याची ! नद्यांना बिघडवण्यात पालिका, उद्योग, कारखाने, नेते यांची मनमानी व त्याद्वारे होणारे शोषण या पुढे चालणार नाही ! असा इशारा न्यायालयाने दिलाच आहे. आता गरज आहे आपण प्रत्यक्ष उभे राहून ‘हे होऊ देणार नाही’ असेच ठामपणे म्हणण्याची आणि त्यानुसार पावले उचलण्याची !
http://in.youtube.com/watch?v=mnlMg_MJZ78&feature=channel_page
(भारतीय राजघटनेमध्ये पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी नद्यां, सरोवरे, वने व त्यामधील निसर्गसाधन संपत्ती आणि वन्यप्राणी, पशूपक्षी, जलचरांचे रक्षण करणे हे सरकारचे आद्य कर्तव्य आहे ! असे म्ह्टले आहे. हे फक्त सरकारचे काम आहे असे म्हणत सर्वसामान्यांनी आपली जबाबदारी टाळणे योग्य आहे का ?)
‘मी मुंबईकर ! मुंबई मेरी जान !’
मुंबाईत बुधवारी रात्री झालेल्या थरारक दहशतवादी ह्ल्ल्यात दिडशेहून अधिक बळी गेले. ‘एन एस जी’ चे कमांडो संदिप उन्निक्रुष्णन आणि त्यांचे एक सहकारी कमांडो गजेंद्र सिंह हे ही हुतात्मा झाले. त्यातच होते तीन जिगरबाज ‘मुंबईकर’ पोलीस अधिकारी…. दहशतवादविरोधी पथकाचे प्रमुख हेमंत करकरे, अतिरिक्त पोलीस आयुक्त अशोक कामटे आणि खंडणीविरोधी पथकाचे एन्कउंटर स्पेशालिस्ट विजय साळ्सकर. मुंबईकरांच्या रक्षणासाठी स्वत:च्या प्राणाची बाजी लावणा-या मुंबई पोलीस दलातील या ‘मुंबईकर’ हिरोंना ‘गंगाजल नेचर फौंडेशन’चा विनम्र प्रणाम !
‘कर्तव्यकठोर’

- हुतात्मा हेमंत करेकरे
अतिरेक्यांच्या गोळीबारात शहीद झलेले दहशतवादविरोधी पथकाचे प्रमुख, पोलीस सहाअयूक्त हेमंत करकरे यांच्या म्रुत्युने केवळ महाराष्ट्र पोलीस दलातच नव्हे, तर भारतीय गुप्तचर यंत्रणेतही हळ्हळ व्यक्त केली जात आहे. अत्यंत हुशार, धाडशी व सहका-यांना विश्वासात घेऊन काम करणारे अधिकारी म्हणून त्यांचा लौकिक होता. गुप्तचर यंत्रणेतील त्यांचा प्रदीर्घ अनुभव लक्षात घेऊन अलीकडेच त्यांच्याकडे ‘एटीएस’चे प्रमुख म्हणून पदभार सोपवला होता. मुळचे मंगलोरचे असलेले हेमंत करेकरे मेकँनिकल इंजिनीर होते. केंद्रीय प्रशासन सेवेची परीक्षा देऊन १९८४ मध्ये भारतीय पोलीस सेवेत रुजू झाले. त्यांची नेमणूक महाराष्ट्र पोलीस केडरमध्ये झाली. चंद्रपूरसारख्या नक्षलग्रस्त विभागापसून ते अकोला, नांदेड, ठाणे येथे त्यांनी पोलीस अधीक्षक म्हणून केलेली कामगिरी लक्षणीय ठरली. मुंबईत गँगवाँरने हैदोस घातला होता, तेव्हा करकरे मुंबईच्या परिमंडळ ४ चे उपायुक्त होते. त्या वेळी या परिमंडळात येणा-या भायखळ्यापासून दादर,माटूंगा,परळ, अँण्टाँप हिलपर्यंतच्या परिसरात आरुण गवळी,अमर नाईक,पोत्या ठाकूर यांच्या कारवाया सूरू होत्या. करकरे यांनी या टोळ्यांवर नियत्रंण आणण्यात यश मिळवलं. करकरे यांच कौशल्य आणि धाडस पाहून त्यांना प्रतिनियुक्तीवर केंद्रात पाठवण्यात आले. तेथे ‘राँ’ या गुप्तचर संघटनेत त्यांची नेमणूक झाली. तीन वर्षांपूर्वी ते पुन्हा महाराष्ट्रात आले. काही काळ ते मुंबई पोलीसाच्या प्रशासन विभागाचे सहाअयुक्त होते. अलीकडेच त्यांची नियुक्ती ‘एटीएसचे’ प्रमुख म्हणून झाली होती. या काळात त्यांनी गुजरात येथे झालेल्या बाँम्बस्फोटातील आरोपींना पकडण्यात यश मिळ्वले होते. वादग्रस्त ठरलेल्या मालेगाव बाँम्बस्फोटाचा तपास अत्यंत संवेदनशील वळ्णावर असतानाच बुधवार २६ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री अतिरेक्यांबरोबर झालेल्या चकमकीत ते ‘शहीद’ झाले.
‘डेअरडेव्हिल’
पोलीस निरीक्षक पदावर आसतानाही पोलीस आयुक्तांपेक्षाही अधिक चर्चेत राहणारं नाव म्हणजे विजय साळसकर! विजय साळसकर या नावाची गुन्हेगारी विश्वात प्रचंड जरब होती. मुंबईतील रस्ते गुन्हेगारांच्या गोळीबाराने हादरले होते, गुन्हेगार सामान्य लोकांच्या रक्ताचे सडे पाडत होते. त्या काळात विजय साळसकर यांनी ‘सद्सरक्षणाय खलनिग्रहणाय’ या पोलीस दलाच्या ब्रीदवाक्याला जागून त्यांनी आपल्या बंदुकीचा चाप ओढला. २४ वर्षांच्या पोलीस सेवेत त्यांनी ७८ गुंडांना यमसदनी धाडले. त्यांनी गुन्हेगारीच्या फांद्याच छाटल्या नाही, तर त्या टोळ्यांच्या मुळावरच घाव घातला. मुंबईतील व्यापा-यांना, व्यावसायिकांना सळो की पळो करून सोडणा-या आमर नाईक याला ठार करून साळसकर यांनी संपूर्ण ‘बापट गँग’ मुळासकट उखडून फेकली. अरुण गवळीचे बिनीचे शिल्लेदार म्हणून ओळखले जाणारे विजय तांडेल,बंडया अरिवडेकर, गणेश भोसले तसेच दाऊद गँगचा साधू शेटटी अशा म्होरक्यांनच टिपून त्यांनी व्यापारी, व्यावसायिकांसह सर्वसामान्यांना दिलासा दिला. माजी पोलीस महासंचालक अरविंद ईनामदार यांच्या तालमीत १९८३ साली तयार झालेल्या विजय साळ्गावकर यांच्या अकस्मित जाण्याने महाराष्ट्र पोलीस दलात भरून न येणारी पोकळी निर्माण झाली आहे.
‘जिगरबाज’
सहा फुटाच्याही वर जाणारी उंची, कमावलेली पिळदार शरीरसंपदा आणि गुन्हेगाराकडे नजर वळवून बघितल तरी त्याने गुन्हा कबुल करवा आशी जरब. परिस्थिती कितीही बिकट असो, अत्यंत थंड डोक्याने तिचा मुकाबला करतानाच गरज भासली तर चर्चेतून तोडगा काढणे ही अशोक कामटे यांची खासियत होती. भारतीय पोलीस सेवेतील १९८९ च्या बँचचे अत्यंत हुशार अधिकारी म्हणून अशोक कामटे यांचा पोलीस वर्तुळात दबदबा होता. कामटे बाँडीबिल्डर होते. जलतरणपटू होते. अँथलीट होते. नेमबाज होते. आणि वेटलिफ्टरही. आजोबांच्या काळापासूनच लष्कर आणि पोलिस सेवेची पार्श्वभूमी कामटे खानदानाला होती. कामटे ख-या अर्थाने गाजले ते आमदार रवी पाटील यांना त्यांनी सुतासारखं सरळ केल्यापसून. पाटील आमदार होते कर्नाटकातील इंडिचे, पण त्यांची व त्यांच्या भावाची दहशत सोलापूरात. कामटे सोलापूरमध्ये पोलिस आयुक्त आसताना इशारा देऊनही कामटे माझे काय वाकडं करणार, अशा गुर्मीत असलेल्या रवी पटील यांनी १० वाजल्यानंतर फटाके फोडण्याचा आचरटपणा केला आणि कामटे यांनी या पाटीलांची भररस्त्यात वरातच काढली. समोर आव्हान कोणतेही असो, जीवची बाजी लावून त्याचा मुकाबला करण्यास सदैव सज्ज असा जिगरबाज पोलिस अधिकारी म्हणजे अशोक कामटे, बुधवारी त्यांनी देह ठेवला तोही लढता लढताच.
भारतमातेच्या या विरपुत्रांना भावपुर्ण श्रध्दांजली !
जय हिंद ! जय भारत !
Bombs And Bullets Cannot Destroy India – As Long As
Its Gates Remain Open !
Whoever were the authors of this week’s terrorist attack in Mumbai, it was a vile act that will only serve reaction in India and internationally. Unquestionably the BJP will seize on the Mumbai atrocity and its horrific toll in human life to try to suppress public discussion of, and derail the investigation, into the Hindu terrorist network
Bombs And Bullets Cannot Destroy India – As Long As Its Gates Remain Open
By Shashi Tharoor
http://www.countercurrents.org/tharoor281108.htm
This atrocity was not homegrown. But if it leads to demonisation of the nation’s Muslims, the terrorists will have won
Once Was Mumbai
By Kumar Ketkar
http://www.countercurrents.org/ketkar281108.htm
Who Benefits From Mumbai Terror Attacks?
By Binu Mathew
http://www.countercurrents.org/mathew291108.htm
India’s 9/11. Who Was Behind The Mumbai Attacks?
By Michel Chossudovsky
http://www.countercurrents.org/chossudovsky011208.htm
Uttarakhand govt sounds red alert on the Ganga !, Gangajal Nature Foundation, Mumbai ‘appeals’ to all nature lover tourists, travelers and mountaineers.
Gangajal Nature Foundation, Mumbai ‘appeals’ to all nature lover tourists, travelers and mountaineers. Every year thousands of tourists, travelers and mountaineers travel further from Gangotri to visit the origin of the river Ganga at Gomukha. But from this year onwnment of the government of Uttaranchal has prohibited the general public from visiting Gomukha. The place has been declared out of bounds for the general public. An eviction notice has been served to a Lalbaba Ashram situated in Bhojvasa, about three Kms from Gomukha. The government has closed down about 100 dhabas enroute to Gomukha run by the forest department of Gangotri national park. This includes the resthouse of Garhwal Nigam Vikas Mandal situated in Bhojvasa. Horsemen and palkhiwalls who ferry people to – and fro from Gomukha have been permanently banned entry to the place. Everyday about 150 mountaineers get prior permission from the forest department to reach Tapovan via Gomukha and
further for the Kalindi trek. Hopefully this traffic of mountaineers and mountain expeditions which receive prior permission from the forest department will also reduce. This is a serious effort by the Uttarakhand government to salvage Gomukha. It requires earnest support from the public, pilgrims and nature lover tourists. This effort was imminent to save the fast receding glacier of Gomukha- presently at the rate of 40 meters per year. If the global melting continues at this rate it will soon cross the national border on to China. Ganga represents the Indian culture and is highly revered in the sentiment of the Indians. To keep this lifeline of the country alive, it is necessary to save “Gomukha”. Let’s come together and join hands to save the River Ganga!
Yours
Vijay Mudshingikar
President, Gangajal Nature Foundation, Mumbai(Regd)


‘गंगाजल पर्यावरण विषेशांक २००८’
गंगेच्या नावानं चांगभलं !
२००८ हे वर्ष जागतिक नदीवर्ष म्हणून जगभर साजरे होत आहे. या नदीवर्षात गंगानदीला ‘राष्ट्रीय नदी’ घोषीत करून पंतप्रधानांनी तमाम गंगा प्रेमीनां आणि भारतवासीयांना छट पूजेचा प्रसादच दिला आहे त्या बद्द्ल पंतप्रधानांचे अभिनंदन आणि आभार. जगातील सर्वात पवित्र नदी म्हणून गंगेकडे पहीले जाते, भारतीयांसाठी ती केवळ नदी नाही तर देवता देखील असून श्रध्देच्या अढळ स्थानावर विराजमान झाली आहे. या नदीला ‘राष्ट्रीय नदी’ घोषीत करून पंतप्रधानांनी गंगा प्रदुषणाचा प्रश्न परत एकदा ऐरणीवर आणला आहे. मात्र ही केवळ घोषणा न ठरता गंगाप्रदुषण निवारण अभियानातील पुढचे पाऊल ठरो. गेली सत्ताविस वर्षे ‘गंगाप्राधिकरण’ गंगाप्रदुषण निवारणाचे काम करीत असुनही गंगाप्रदुषणात घट न होता वाढच झाली आहे. आता तर तिच्या अस्तित्वालाच धोका निर्माण झाला आहे. या निर्णयाने गंगानदीच्या संवर्धनकार्यात सर्वसामान्याच्या सहभागाने वाढ होऊन गंगानदी पुर्विसारखी ‘निर्मळगंगा’ होओ हीच वेडी आशा. जगाच्या पाठीवर गंगे इतकी पवित्र नदी दुसरी कोणतीही नही. हजारो वर्षांपसुन कोटयांवधी भारतीयानां जीवनदान देत गंगेचा प्रवाह वाहतो आहे. गंगाजी, गंगामैया, गंगादेवी अशा आदरार्थी नावानेच आपण हरगंगेचा उल्लेख करतो. कारण, भारतीय हिंन्दु संस्कृतीचा जन्म गंगामातेच्या उदरातुनच झाला. भोजव्रुक्षाच्या सावलीत ती विकास पावली. व्यास, वशिष्ठ व वाल्मिकी सारखे द्रष्टे ॠषि मुनी व महाकवी कालीदास यांच्या प्रतिभा गंगाकिनारीच फुलल्या. त्यातुनच रामायण, महाभारत, वेदपुरणे व शाकुंतल
आणि मेघदुत या सारखी महकाव्ये आदी ग्रंथांची निर्मीती झाली. सम्राट चन्द्रगुप्त मोर्य,सम्राट अशोका सारखे महाप्रक्रमी राजे आणि त्यांच्या राजाधान्यां गंगाकाठी उभ्या राहील्या. गंगाकिना-यावरील बोधीव्रुक्षाखाली गौतमबुध्दानां ज्ञानाचा साक्षात्कार झाला आणि ते भगवान बुध्द झाले. गंगाजलाच्या तंरगाशी भारतवर्षाच्या अनेक आठवणी बांधल्या गेल्या आहेत. भारताच्या जयपराजयाची साक्षीदार गंगामैयाच आहे. आपल्या विजयगीताचे तिनेच कौतुक केले तर पराजयाच्या आक्रोशात सांत्वनही तिनेच केले. आमच्या प्राचीन संस्कृतीचे आणि जीवन प्रवाहाचे प्रतिक गंगामाई आहे. काळाच्या ओघात प्रवाह बदलत गेले प्रतिक मात्र गंगामाईच राहीली.
छत्रपति शिवजी महाराजांच्या राज्याभिषेकासाठी ‘पंचनद्यां’चे जल आणले गेल्याचा उल्लेख इतिहासात आहे. त्यात ‘गंगाजल’ अग्रस्थानि होते. सर्वच मोघल सम्राट गंगाजलच प्राशन करीत. गंगाजलच आणण्याची त्यांची वेगळी व्यवस्था असे. आजही वाराणसीचे नरेश यांच्या साठी वर्षभराचे गंगाजल गंगोत्रीहुन आणले जाते. ऐतिहासिक दस्तावेजा नुसार गंगनदीच्या उगमाचा शोध घेतला गेल्याचे अकबर बदशहाच्या शासन कालखंडात सन १५६५ ते १६०५ दरम्यान मानले जाते. त्या वेळी एक अभियानदल अत्यंत कठीण परिस्थित नैसर्गिक आपत्तिनां तोंड देत गंगानदीचे उगमस्थळ ‘गोमुखा’ पर्यंत पोहचले होते. पुढे ईस्ट इंडिया कंपणीच्या सर्वेक्षण विभागाने सन १८१७ मध्ये सर्वे आँफ इंडियाचे
कँप्टन जाँन हाँगसन व कँप्टन हाँवर्ड हे काही साधुसंत आणि यात्रेकरु यानां बरोबर घेऊन गंगोत्रीमार्गे गोमुखा पर्यंत पोहोचण्यात यशस्वी झाले होते. तेथे त्यांनी पाहीले की विशाल हिमगुफेतून निळभोर देवनदी गंगामैया वाह्त आहे. या विशाल हिमगुफेवर भव्य भगीरथी पर्वतांचा विशाल समुह आणि शिवलिंग पर्वत विराजमान आहेत. हरिद्वारची कावडयात्रा, इलाहाबादचा कुंभमेळा, वाराणसीची देवदिपावली, पटण्याची छटपुजा,कोलकत्याचा दुर्गा उत्सव, पश्चिम बंगाल मधील गंगासागरयात्रा हे सगळेच सांस्कृतिक उत्सव गंगाकिना-यावर होतात. गंगातटावर सर्व धर्मिय गुण्यागोविंदाने राहतात.
गंगोत्री ग्लेशियर हा हिमालयातील विशाल हिम पर्वतरांजीच्या दक्षिण टोकाचा एक भाग आहे. या मध्ये संतोपन्थ, भगीरथ, शिवलिंग सारखे उंच प्रमुख पर्वत आहेत. तर रक्तवर्ण, चतुरंगिनी,श्वेता, वासुकी, कीर्ति, तसेच कालिंदी हे सहाय्यक पर्वत आहेत. या हिमनगाचे क्षेत्रफळ २०० वर्ग कि.मी. आहे जो अंशताह बर्फमय प्रदेश आहे. २००० साली केलेल्या पाहणी नुसार गोमुखाची उंची ४० मीटर होती. हिमनग वैज्ञानिकांच्या मते हिमालयाचे क्षेत्रफळ हळूहळू आकुंचन पावत आहे. ग्लोबल वाँर्मिंगमुळे हिमनग वितळण्याची गती पुर्वी पेक्षा वर्तमानात वाढली आहे. लखनऊ येथील भारतीय भू-विज्ञान सर्वेक्षणाने केलेल्या पाहणीनूसार गंगोत्री हिमनग, साल १९३५ ते १९५६ या कालावधीत प्रतिवर्षी १० मीटर या
गतीने वितळत होता. तर साल १९५६ ते १९९० या कालावधीत हिमनग वितळण्याची गती वाढून २७ ते ३० मीटर मोजली गेली. गोमुख, गंगोत्री परिसरात होत असलेली पर्यटक, यात्रेकरु यांची वाढती गर्दी, हिमालयातील थंडीचा विचार करता मानसी दोन किलो लाकडे आंघोळीच पाणी गरम करण्यासाठी आणि जेवणासाठी प्रतिदिनी लागतात तसेच आश्रमांची होणारी वाढ त्या साठी होणारी वॄक्षतोड, तर टेहरी धरणाच्या निर्मितीसाठी एक करोड वॄक्षांची कत्तल करण्यात आली ज्या भुजपत्रावर रामायण, महाभारत, वेदपुराणे व शाकुंतल, मेघदूत या सारखी महाकाव्ये आदी ग्रंथ लिहले तो भोज वॄक्ष नष्ट होण्याचा मार्गावर आहे, आणि याउपरही परिस्थिती अशीच राहीली तर येत्या ५० वर्षात देवनदी गंगा लुप्त होइल. मात्र उत्तराखंड सरकारने या वर्षापासून सर्वसामान्य यात्रेकरू आणि पर्यटक यांच्यावर पुर्वपरवानगी शिवाय गोमुखापर्यंत जाण्यावर निर्बधं घालून गंगारक्षणाच्या दिशेने आगेकूच केली आहे. दरवर्षी हजारो पर्वतारोही गोमुखा मार्गे कालिंदी शिखराकडे पर्वातारोहणासाठी जातात. तसेच ‘कावडयात्रॆ’ दरम्यान लाखो शिवभक्त गोमुखाला भेट देतात दरम्यान जुन्या कावडी तेथेच टाकून नवीन कावडीतून ‘गंगाजल’ घेवून जातात यामुळे होणारे प्रदुषण काही प्रमाणात कमी होईल. मात्र पर्वातारोहण हा एक खेळाचा भाग असल्यामुळे पुर्वपरवानगीने दिवसाला १५० पर्वातारोही गूमुखाला भेट देऊन पुढे जातात. मात्र यावरही कडक निर्बधं घालुन गोमुख वाचवणे आत्यंत गरजेचे आहे. कारण गोमुखा पासुन चीनची सीमा मात्र ७० कि.मी. असल्याचे गंगोत्री राष्ट्रीय उद्यानाच्या
अधिका-यांकडून समजले तर मानवी दुष्क्रुत्यां मुळे वर्षाला ४० मिटरपेक्षाजास्त गतीने वितळणारे गंगानदीचे उगमस्थल ‘गोमुख’ काही वर्षांतच चीनच्या सीमेपार जाईल अशी भीती त्या अधिका-यांनी व्यक्त केली. आणि त्या मुळेच भारताची ओळख असलेल्या गंगानदीला वाचवण्यासठी गोमुख बचाव अभियाना पासुनच करावी लागेल. हिमालय आणि त्याच्या एका हिमनगातून उगम पावणारी देवनदी गंगा या दोघांबद्दल स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान स्वर्गिय पंडित जवाहरलाल नेहरु यांच्याही मनात नितांत आदर होता. तो वारसा इंदिरा गांधींकडेही आला. निसर्ग, वन्यजीवन, पर्यावरण या विषयी त्यांना विषेश आस्था होती. गंगेचे बकालपण त्यानां खूपणे स्वाभाविकच होते. साल १९७९ मध्ये पंतप्रधानपदी येताच त्यांनी या प्रश्नात लक्ष घातले आणि गंगानदीच्या खो-याची सर्वांगीन पाहाणी ‘केद्रिय प्रदुषण नियंत्रन मंडळा’ मार्फत हाती घेण्यात आली. त्याचे दोन सविस्तर अहवाल सादर होताच, त्या आधारे गंगनदीच्या शुध्दीकरणाची क्रुती योजना आखण्याची कार्यवाही सुरु झाली. १९८४ च्या आँक्टोबर मध्ये पंतप्रधान इंदिरा गांधी यांची निर्घुन हत्या झाल्यानंतर राजीव गांधी पंतप्रधानपदावर आले.त्यांनी गंगानदी शुध्दिकरण क्रुती योजनेला आनखी गती दिली. तसेच
केंद्रसरकारची योजना असे जहीर करुन त्यास प्राधान्य दिले. अतिशय मह्त्वाकांक्षी आणि इतर राष्ट्रापूढेही आदर्श ठेवण्याची क्षमता असणारी
गंगा क्रुती योजना अर्थात ‘गंगा अँक्शन प्लान’ हे काही केवळ राजीव गांधी यांचे स्वप्न नव्हते. धर्ममार्तडांचा आणि साधुसंताचां रोष पत्करून गंगजल शुध्दिकरणाचे काम त्यांनी जोमाने सुरू ठेवले. त्यातूनच ॠषिकेशमधील मुनी को रेतो आणि हरिद्वारमधील जगजीतपूर येथील सांडपाणी जलशुध्दीकरण प्रकल्पांची निर्मिती झाली. पूर्वी ॠषिकेश व हरिद्वार या शहरांच सांडपाणी व मलमुत्र गंगानदीतच सोडले जात असे. गंगाप्रदुषणाची सुरुवात ॠषिकेश व हरिद्वार या शहरांपासुनच होत होती, पण या प्रकल्पांच्या निर्मिती नंतर दोन्ही शहरांच सांडपाणी व मलमुत्र या प्रकल्पांत जमा केले जाते, त्यावर शुध्दीकरणाची प्रक्रिया होऊन केलेले पाणी पुन्हा शेतीसाठी वापरले जाते. तर या प्रकल्पांत गोबरगँस व खत याचही उत्पादन होऊ लागले. हे जलशुध्दीकरण प्रकल्प गंगा शुध्दीकरण मोहीमेतील आदर्श उदाहरण आहे.
वाराणशीतील दशाश्वमेघ घाटावर सभारंभपूर्वक सुरु करण्यात आलेला, २९३ कोटी रुपये खर्चाचा पहिला टप्पा १९८६ ते १९९३ या कालावधीत राबवून पूर्ण करण्यात आला. पण दुर्दैवाने उत्तरेतील राज्यांमधील अस्थिरता, अंमलबजावणीस लागलेली भ्रष्टाचाहाची कीड् आदीकारणांमुळे ही योजना पुढे फसतच गेली. याचे परिणाम मात्र गंभीर झाले. आज उत्तरेतील लक्षावधी लोकांना ते भोगावे लागत आहेतच, पण खुद्द गंगानदीचे अस्तित्वही धोक्यात आले आहे. आज गंगेची काय अवस्था आहे? बिहारसारख्या राज्यात गंगेचे पात्र पाच-पाच किलोमीटर रुंद एवढे विशाल
आहे. पटणा जवळ तर ते सात किलोमीटर रुंद आहे. उन्हाळ्यातदेखील हिमसाठे वितळून पात्रात प्रवाह खेळत राहत असे. आज गंगेच्या खो-यात अनेक धरणे आणि वीजप्रकल्प उभे राहिल्यामुळे पात्रातील पाण्याचे प्रमाण कमी होत गेले. उत्तर प्रदेशाच्या मानाने बिहारमध्ये पात्राचे कोरडेपण वाढत जाते. पाच-पाच, सात-सात किलोमीटर रुंदीच्या विस्तीर्ण पात्रात पाण्याचा प्रवाह एका बाजूला राहून मैलोनमैल पात्र उघडे पडते. छटपूजेसाठी भाविक नदीत उतरतात, तेव्हा हे वाळवंट आणि दलदल विशेष जाणवते. गंगा आटल्यामुळे तीच्या खो-यातील भुअतंर्गत पाण्याची पातळी खाली चालली आहे. विषेशता: बिहारमध्ये त्यामुळे पाण्याचे दुर्भिक्ष्य वाढू लागले आहे. उत्तरेकडून, हिमालयात उगम पावून वाहत येणा-या कोसी, कमला बालन, गंडक, बुरी गंडक आदी नद्या बिहारमध्ये गंगेला मिळतात. मात्र त्या सर्वस्वी मान्सू्नच्या पावसावर अवलंबून असतात आणि उन्हाळ्यात त्या पूर्ण कोरड्या पडतात. त्याचा परिणाम विशेषत: दक्षिण बिहार दुष्काळी होण्यात होतो. बिहारची भौगोलिक परिस्थिती अशी विचित्र आहे की, उत्तरेकडील नद्यांना पूर् येऊन ओला दुष्काळ पडतो, गावेच्या गावे पाण्याखाली जातात, शेतीचे नुकसान होते. तर दक्षिणेकडे पिण्यासाठीही पाणी मिळत नाही, दुष्काळ-रोगराईचे संकट ओढवते ! जीवनदायिनी गंगा बिहारनध्ये अशी दोन बाजूंनी जीवघेणी ठरते. गंगेचे अस्तित्व आणखी चारच दशकांत धोक्यात
येईल, असा ‘डब्लूड्ब्लूएफ’ चा इशारा खरा ठरला तर आर्थिक, सामाजिक, राजकीय अशा सर्वच क्षेत्रात बिहारची विभागणी करणारी गंगा संपूर्ण उत्तर भारताचे चित्र पालटवून टाकेल! अर्थात ते अत्यंत भयावह चित्र असेल. दक्षिण बिहारमधील ४७ लाख हेक्टर जमिनीपैकी वीस लाख हेक्टर जमीन जलसिंचन योजनांच्या लाभापासून अजूनही वंचित आहे. गंगेलगतच्या गावांना गंगे लगतच्या गावानां आणि शेतजमीनीला पुर्वी पाणीटंचाई जाणवत नसे. मात्र गेल्या पन्नास वर्षात गंगेचे पात्र आक्रसत गेल्याचे तेथील रहीवासी सांगतात आणि तेच वाढत्या पाणीटंचाईचे कारण आहे. दक्षिण बिहारमधील शेती आणि लोकजीवनही यापुढील काळात अधिक होरपळणे अटळ आहे. या वर्षी ‘बिहारचे अश्रू’ म्हणूनच ओळखली जाणा-या कोसीनदीच्या प्रवाहात सत्तर वर्षात प्रथमच मोठ्या प्रमाणात बदल झाल्याने उत्तर बिहारमध्ये हाहाकार माजला होता. एंकदरीत पंधरा जिल्हातील ३० लाखांहून जास्त लोकांना या महाभयंकर पूराचा तडाख बसला आहे. मधेपूरा, सहरसा, आरारिया हे जिल्हे तर अक्षरश: जलमय झाले होते. यामुळे जनजीवन तर विस्कळीत झाले आहेच पण अनेकांना आपल्या प्राणास मुकावे लागले आहे तेथील जनजीवन आजही पुर्वस्थितीवर आलेले नाही. बिहार मधील सालाबाद पूरस्थितीला फराक्का बांध तर कारणीभूत नाही ना? याचा आढावा केंद्रसरकारने पुनश्च घ्यावा. (फराक्का बांधावरील विश्लेशणयुक्त विमोचन ज्युलियन हाँलिक यांच्या ‘गंगा’ या पुस्तकात वाचायला मिळते. प्रकाशक- अमेया प्रकाशन, मराठी अनुवाद-प्रकाश अकोलकर).
बिहारची अशी अवस्था; म्हणून उत्तर प्रदेशात आलबेल असेल, असे समजण्याचे मुळीच कारण नाही. मात्र तेथील स्वरुप वेगळे आहे. कानपूर,
मिर्झापूर्, अलाहाबादसारखी ४८ शहरे गंगेच्या वसलेली आहेत. यापैकी लाखाच्या संख्येत लोकवस्ती असलेल्या २९ शहरांचे सर्व सांडपाणी वेगळ्या ठिकाणी गोळा करुन त्यावर प्रक्रिया करण्याचे प्रकल्प पूर्वीच हाती घ्यायला हवे होते. गंगा कॄती योजनेच्या पहिल्या टप्प्याची आखणी करताना, गंगेकाठच्या ११४ मोठ्या गावांमधून दररोज एक अब्ज चाळीस कोटी लिटर सांडपाणी गंगेत सोडले जाते, असा अंदाज करण्यात आला होता. पण २५ वर्षांत ही स्थिती किती भयावह झाली आहे, यासाठी एकट्या वाराणशीचे उदाहरण पुरेसे ठरावे. केवळ वाराणशीतून दररोज दोन अब्ज लिटर सांडपाणी गंगेत सोडले जाते. कानपूर मध्ये शेकडो चर्मोद्योग आहेत,तसेच वाराणशीत रंगीत साड्यांच्या गिरण्या आणि मिर्झापूरमध्ये गालिच्यांचे कारखाने आहेत. कानपूरचे १५० चर्मोद्योग वाराणशीचे ४० साडी प्रिंटींग प्रकल्प, मिर्झापूरचे १० कार्पेट-डाइंग यूनिटस प्रदूषण नियंत्रणाचे काहीही नियम न पाळता, प्रकॄतीस हानिकारक असे रासायनिक दूषित पाणी गंगेत सोडतात.
गंगेला ‘माता’ मानले जाते. मरणोउपरांत आपला पार्थिवदेह ‘गंगार्पण’ व्हावा, असे मानणारे हज्जारो लोक आहेत. गंगेकाठी अंतविधी पुर्ण न करताच अर्धवट जळालेले पार्थिव देह आजही मोठया प्रमाणात गंगानदीच्या प्रवाहात सोडून दिले जातात. केवळ वाराणसीमध्ये दरवर्षी ४००० हून जास्त मानवी पार्थिवदेहांच गंगानदीच्या प्रवाहात विसर्जन केले जाते जनावरांच्या पार्थिवा बाबत न बोललेले बरे ! अगदी अस्थि विसर्जनासाठी देखील प्राधान्य दिले जाते ते गंगेलाच.
गंगेचे प्रदुषण एवढयावरच थांबत नाही. कोलकोत्याला प्रसिध्द हावडा ब्रिज खालिल परिसरात गंगा किना-यावरील घाण पहावत नाही. नवरात्री नंतर होणारे दुर्गाविसर्जन कशा आवस्थेत होते हे तर सर्वज्ञात आहे. कालीघाटावर नावाप्रमाणे काळेभोर झालेल्या ‘गंगाजलाने’ आचमन केल्याशिवाय भक्त कालीमातेच्या मदिंरात जात नाहीत. गंगातटावर असलेल्या बेल्लुरमठातील प्रसन्न वातावरण, तिथली स्वच्छता, शांतता यामुळे मनात पावित्र्य निर्माण होते. मात्र मठाच्या मागील बाजुस गंगकिना-याकडे गेल्यास, नागरी वस्त्यांच्या सांडपाण्याचा एक मोठा नाला ‘गंगाजल’ ब-यापैकी दुषीत करताना दिसतो. एका तटावर बेल्लुरमठ तर पैलतटावर दक्षिणेश्वर हे कालीमातेच प्रसिध्द आणि बंगाली बांधवानां पवित्र असणारे मदिंर आहे. याच ठिकाणी रामक्रुष्ण परमहंसाना कालीमातेन साक्षात्कार दिल्याच मानल जाते.मदिंरातील स्वच्छता खुप चांगली आहे. मठातील, मदिंरातील स्वच्छता तर गंगतटावरील अस्वच्छता य मुळे मनातील गोंधळ गंगाप्रदुषणा सारखा वाढतच जातो. पश्चिम बंगाल मध्ये ४५ कारखाने गंगातटावर आहेत. हे कारखाने चालवण्यासठी ‘गंगाजलच’ वापरले जाते तर वापरलेले टाकवू रसायनयुक्त सांडपाणी कोणतीही शुध्दिकरणाची प्रक्रिया न करताच गंगानदीच्या पात्रात सोडले जाते. पुढे गंगासागरला जाणा-या ‘गंगाजलात’ मानवी
शरीराला घातक ठरणारे रसायण, मलमुत्र सांडपाण्याच्या स्वरुपात मिसळते. प्रतिवर्षी १४ जानेवारीला होणा-या ‘गंगासागर’ यात्रेहून लाखो यात्रेकरुद्वारा आनले जाणा-या ‘गंगाजल’ प्राशनाने खरोखरच ‘मोक्ष’ मिळेल का ?
आम्हा भारतियांच्या मनात गंगेच नेमक स्थान आहे तरी काय ? हिमालयाच्या डोंगरद-या पार करून थेट पश्चिम बंगालच्या सागरबेटांपाशी बंगालच्या उपसागराला जाऊन मिळणारी ही महानदी. या नदीच्या दर्शनाने कोटयांवधी भारतीयांचे हात आपोअपच जोडले जातात आणि ‘गंगाजल’ म्हणजे साक्षात अम्रुत.‘गंगास्नान’ आणि ‘गंगाजल’ प्राशन या दुहेरी योगा नंतर स्वर्गाची द्वारे आपल्यासठी हमखास उघडतात अशी मनापसून श्रध्दा असलेले आम्ही भारतीय या महानदीचा इतक -हास कसा काय करू शकतो ?
आणखी उशिर होण्यापुर्वी या नदीला स्वास घेण्याची फुरसत द्यायला हवी. त्या साठी संघटित लोकशक्तिचा दबाव आणुन राजकिय इच्छाशक्ति या प्रश्नाकडे वळवणे, हाच गंगानदीला वाचवण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे. गंगमाईला वाचवणे आता सर्वसामान्यांच्या हाती आहे हे मात्र खर !
शंभर करोड पेक्षा जास्त लोकसंखेच्या या भारतात किती लोक गंगा शुध्दीकरणाच्या किंवा गंगानदीला वाचवण्याच्या विरोधात असतील? कोणताही पक्ष, कोणतीही संघटना किंवा सर्वसामान्यांपैकी कोणी विरोधक असणं शक्यच नाही. असे असताना बहुमताच्या मुद्दावर ही समस्या कधीच सुटायला पाहिजे होती पण तसं झाले नाही ही वास्तूस्थिती आहे. याला कारण राजकीय इच्छाशक्तीचा अभाव या बरोबरच, आम्ही काय करणार? हे सरकारचे काम आहे असे म्हणत सगळी जबाबदारी झटकून टाकायची ही भूमिकाच गंगानदीच्या -हासाला कारणीभूत ठरत आहे. आता गरज आहे प्रतेक भारतीयांनी भागिरथ होण्याची, गंगामैयाच्या संवर्धनासाठी खारीचा वाटा उचलण्याची. सेतूसमुद्रम, रामजन्मभूमी, बाबाअमरनाथ अशा अनेक मुद्दावर केंद्र सरकारला जागे करण्यासाठी राष्ट्रीय पातळीवर जनाआंदोलन आयोजली जात्तात अन् ती यशस्वीही होत्तात. मग हिंन्दू संस्कृतीची जननी, समस्त भारतीयांची जीवनरेखा आणि श्रध्देच्या अढळ स्थानावर विराजमान असलेली मोक्षदाईनी गंगामैया हीच्या संवर्धनासाठी, केंद्र सरकारला जागे करण्यासाठी राष्ट्रीय पातळीवर जनाआंदोलनांच आयोजन का होत नाही ? गंगानदीच्या खो-यातून ८४ खासदार लोकसभेवर जातात. याच प्रमाणे आमदार किती ? नगरसेवक किती ? तर जिल्हापरिषद व ग्रामपंचायत पातळीवरचे लोकप्रतिनीधी किती ? तसेच सर्वसामान्य या सगळयांनी जागे होण्याची वेळ आजून आली नाही का ?
या बरोबरच ज्या राज्यांतून गंगानदी वहात नाही, त्यांनी ही समस्या आपली नाही असे समजण्याच मुळीच कारण नाही. गंगानदीच्या पूरामुळे अथवा तिच्या प्रदुषणाचे परिणाम हे दुरगामी आणि सर्वत्रिक आहेत. कोलकोता, दिल्ली, मुंबई या मेट्रो शहरांवर, गंगानदीच्या दुष:परिणामांना कंटाळलेल्या परप्रांतीयांचा भार वाढतोच आहे शिवाय हा भार भविष्यात इतर राज्यांतील शहरांवर येणार नाही का ? जागो भारतवासी जागो ! अन्यथा गंगनदी शिवाय भारत म्हणजे विनाश ! विनाश ! आणि विनाशच !
विजय् मुडशिंगीकर
अध्यक्ष, गंगजल नेचर फौंडेशन, मुंबई (रजि.)
gangajal blog





























