gangajal blog

Gangajal Nature Foundation's Blog, http://www.gangajal.org.in



Archive for September, 2008

Gangajal Documentary – Hindi

without comments

विश्व के धरातल पर गंगामैया इतनी पवित्र नदी कोई अन्य दुसरी नही है । हजारों सालोंसे हम करोंडो भारतवासीयों को जीवनदान देनेवाली देवनदी गंगा निरंतर बह रही है । भारतीय प्रचिन सभ्यता के अनुरुप हम भारतवसी उनको गंगामैया, गंगाजी, गंगदेवी जैसे आदरणीय नमोंसे संबोधित करते है । इसलिये की वह हम सभी भारतवासीयोंकी जीवनरेखा है । गंगामैया के लहरों से प्राचिन भारतीय सभ्यता का निमार्ण तथा निरंतर विकस भी हूआ । गंगा के किनारों पर व्यास, वशिष्ठ, वाल्मिकी, जैसे महान मुनीवर तथा महाकवी कालीदास एवं संतशिरोमनी कबीर और महान राजनितीग्य चाणक्य पैदा हुये और  गंगामैया के आचंल के छावतले फुले फले एवं वेदपुरण, रामायण, महाभारत तथा मेघदुत और कबीर के दोहो जैसे महाकाव्योंका निमार्ण किया । सम्राट चद्रगुप्त, सम्राट अशोक जैसे महापराक्रमी धीरवीर नरोशों की राजधानिंया इसी के किनारोंपर पुर्णरुपसे विकसीत हुई । गंगा के प्रेममयी शितल आचंलके छाव में फले बोधीव्रुक्ष के छावतले गौतम बुध्द् को ग्यान प्राप्त हूआ और वे भगवान बुध्द् हुये । हिन्दुंस्थानी सभ्यता की प्रगल्भता और शाक्तीमान्यता गंगामैया की देन है । निसंदेह विश्व के धरातल पर गंगामैया इतनी पवित्र, सुरम्य, शक्तिदायक नदी अन्य कही भी नही है. . . .

गंगा आरती

Written by Vijay Mudshingikar

September 28th, 2008 at 5:41 pm

मी मुंबईकर

without comments

पर्यावरणाच्या बाबत आपण किती जागरूक आहोत ? या संदर्भात दोन उदाहरणे देता येतील. २१ मार्च हा दिवस जगभर ‘World Forest Day’ अर्थात ‘जागतिक वन दिन’ म्हणून साजरा केला जातो. त्याच्या औचित्याने जंगलांचे संवर्धन व्हावे म्हणून वॄक्षारोपणासारख्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.शाळा व महाविद्यालयामध्ये परिसंवाद व व्याख्याने यातून विद्यार्थ्यानां प्रबोधनपर मार्गदर्शन केले जाते. पण आपल्याकडे मात्र चित्र वेगळेच असते, या वर्षी २१ मार्च या ‘जागतिक वन’ दिनाच्याच दिवशी होळी हा सण आपण साजरा केला. जगभर जंगलाच्या संवर्धनावर चिंतन होत होते तर आम्ही मात्र संस्कृतीच्या पडदया आडून लाखो टन लाकडांची राख करत होतो.त्याच्या दुस-याच दिवशी २२ मार्च रोजी होता ‘World Water Day’ अर्थात ‘जागतिक जल दिवस’ या दिवशी ‘जल हेच जीवन आहे’, ‘मिळून सारे जन, करू पाणी जतन’ हा संदेश अक्षरश: पायदळी तुडवला. धूलिवंदनानिमित्त रंगपंचमी साजरी करण्यासाठी हजारो लीटर पाण्याचा वापर रंग तयार करण्यासाठी तर वापरलेला रंग धुवून काढण्यासाठी लाखो लीटर पाण्याचा अपव्यय झाला. या वेळी मुंबई पासून दूर खेडयापाडयातील स्र्त्रिया पाण्यासाठी मैलोनमैल वनवन करतात याची आठवण आम्हाला झाली नाही.

‘मी मुंबईकर’ म्हणुन मिरवणा-या कितीजणांना मुंबई हे शहर जगातील सातवे गलिच्छ शहर असल्याचे माहित आहे? आपल्या देशाची आर्थिक राजधानी मुंबई, विश्वविख्यात Bollywood मुंबईत, शेअर मार्केटचे केंद्र मुंबई, देशभरातील कोणतीही महानगरपालिका जमा करून देत नसेल इतका महसुल मुंबई महानगरपालिका जमा करून सरकारला देते. या मुंबईची चिंता सरकार पासून राज्यकर्त्यां पर्यंत कोणालाही असल्याचे जाणवत नाही हेच खरे. जगभरात मुंबई शहराचे आकर्षण आहे आणि त्यामुळेच या महानगरपालिकेच्या महापौरांनाही मान आहे. मुंबईच्या समुद्रात गणेशमुर्तींचे विसर्जन करु नये असे स्पष्ट मत मांडून महापौर डॉ. शुभा राऊळ यांनी पर्यावरणाच्या संदर्भात ठोस पाऊल उचलण्याशिवाय पर्याय नाही हेच सांगितले आहे. धर्म, संस्कॢती या बरोबरच निसर्गाचा समतोलही राखला पाहिजे अन्यथा: निसर्गाच्या क्रोधात धर्म, संस्कॢती बरोबरच मानवी जीवन ही नष्ट होण्यास सेकंद पुरेसा आहे. याची प्रचिती २६ जुलै तसेच सुनामी दरम्यान आलेली असूनही आपण त्यातून काही बोध घेत नाही यातच आपली शेखचिल्ली वॄत्ती दिसून येते.  महापौर डॉ. शुभा राऊळ यांनी मांडलेल्या मुद्दयाच्या संदर्भात विचार करण्या ऐवजी ते महापौरांचे व्यक्तिगत मत असल्याचा सूर आळवणे निश्चितच खेदजनक आहे. राज्यकर्त्यांच्या मृगजळी भाषणात न अडकता समस्त मुंबईकरांनी पर्यावरणवादी महापौर डॉ.शुभा राऊळ यांच्या मुद्दयाचा सारासार विचार करणे अत्यंत गरजेचे आहे.

Written by Vijay Mudshingikar

September 15th, 2008 at 10:49 am